शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

रेल्वेच्या सात गाड्या अपघातामुळे रद्द

By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST

रेल्वेच्या मदतीला एस. टी. धावली

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर कामथेजवळ झालेल्या मालगाडीच्या दुर्घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली असून, यामुळे आज लांब पल्ल्याच्या सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. सात गाड्या रद्द करण्यात आल्या, तर तीन गाड्यांमधील प्रवाशांची कामथे-चिपळूण स्थानकांदरम्यान बसद्वारे ने-आण करण्यात आली. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याने रत्नागिरीसह सर्वच स्थानकांवर प्रवाशांचे मोठे हाल झाले. गाड्याच नसल्याने प्रवाशांना घरचा रस्ता धरावा लागला. रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये सावंतवाडीकडे जाणारी मांडवी, जनशताब्दी, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर तसेच मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी, जनशताब्दी व सावंतवाडी-दिवा पॅसेंजरचा समावेश आहे. ज्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले त्यात मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस, वेरावळ एक्सप्रेस, हापा एक्सप्रेस तसेच मडगावकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोचुवेली एक्सप्रेसचा समावेश होता. कामथे व चिपळूण स्थानकांदरम्यान ज्या गाड्यांमधील प्रवाशांची दुसऱ्या गाड्यांमध्ये व्यवस्था करण्यासाठी ने-आण करण्यात आली त्यामध्ये केरळा संपर्क क्रांती, गोवा संपर्क क्रांती व मंगला एक्सप्रेसचा समावेश होता. आजच्या गाड्या रद्द झाल्याने तिकिटांचे पैसे परत घेण्यासाठी स्थानकातील तिकीट कक्षात प्रवाशाची झुंबड उडाली होती, तर ज्यांच्या दुपारनंतर सुटणाऱ्या गाड्या होत्या, त्यांनीही दुपारी तिकिटे परत करून आपला तिकीट परतावा स्वीकारला. ज्यांना तातडीने बाहेरगावी जायचे होते, त्यांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे पसंत केल्याचेही दिसून आले. (प्रतिनिधी)रेल्वेच्या मदतीला एस. टी. धावलीरत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते कामथे रेल्वेस्थानकाच्या मध्ये मालगाडीचे डबे घसरून झालेल्या अपघातामुळे रेल्वेवाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अडकून पडलेल्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एस. टी. धावली असून, ३० गाड्यांव्दारे प्रवासी वाहतूक सुरू आहे.कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी घसरून होणाऱ्या अपघातात वाढ होत आहे. पूर्वी पावसाळ्यात दरड रूळावर कोसळल्याने वाहतूक ठप्प होत होती. मात्र, आता मालगाड्या घसरत असल्याने त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. एकेरी मार्ग असल्याने रो-रो, मालगाडी व प्रवासी वाहतूक सुरू असते. सकाळी ७.४५च्या दरम्यान घडलेल्या अपघातामुळे प्रवासी वाहतूक कोलमडली. त्याचदरम्यान मुंबईकडून आलेल्या गाड्या चिपळुणात, तर मडगाव कडून आलेल्या गाड्या रत्नागिरी स्थानकात थांबवण्यात आल्या. काही गाड्या रत्नागिरीतून मडगावकडे, तर काही चिपळुणातून मुंबईकडे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे रत्नागिरी ते चिपळूण व परत अशा दुहेरी प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेने परिवहन महामंडळाकडून तीस गाड्यांची मदत घेतली आहे. तीस गाड्यांतून प्रवासी वाहतूक सुरू आहे. (प्रतिनिधी)