शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

जलसंधारणासाठी ७ कोटी खच

By admin | Updated: September 20, 2014 00:35 IST

पाणलोट कार्यक्रम : अयोग्य नियोजनामुळे सभांमध्ये वादंर्ग

सिंधुदुर्गनगरी : गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामावर गेल्या पाच वर्षात तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, या कामातील अयोग्य नियोजन आणि दर्जाहीन कामामुळे जिल्हा परिषदेच्या सभा गाजू लागल्या आहेत.शासनाच्या गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत राज्य कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कामांचे नियोजन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा भरघोस निधी प्राप्त झाला. या निधीतून जिल्ह्याभरात विविध कामे हाती घेण्यात आली व त्यावर प्राप्त झालेला निधी शंभर टक्के खर्चही करण्यात आला. मात्र, राज्य कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कामांची निवड करताना योग्य जागेची निवड न झाल्याने स्थानिक ग्रामस्थ, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने आपल्या सोयीच्या ठिकाणी कामे करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सभांमध्ये सदस्यांनी केला. तर गेल्या पाच वर्षात झालेल्या कामांचा तपशील घ्यावा, अशी मागणीही केली होती. त्यानुसार राज्य कृषी अधीक्षक विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात तब्बल ६ कोटी ७४ लाख २४ हजार एवढा भरघोस निधी खर्च झाल्याचे उघड झाले आहे. मात्र या निधीतून झालेली कामे योग्य ठिकाणी झाली नसल्याचाही आरोप सदस्यांकडून होत आहे. तर या कामातील दर्जा पाहता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २००९-१० पासून गेल्या पाच वर्षात माती नाला बंधारे, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, डोंगर उतार आडवे बांध, लूज बोल्डर ट्रक्चर, अर्दन ट्रक्चर आदी लाखो रूपयांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, कामांमुळे येथील जनतेला त्याचा किती लाभ झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे. बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची आजची स्थिती काय? किती बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले जाते? किती शेती ओलिताखाली आली आहे? हा मोठा गौण प्रश्न आहे.राज्य कृषी अधीक्षक कार्यालयाकडून या कामांचे नियोजन केले जाते. मात्र या योजना व कामांची माहिती स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना दिली जात नाही. कामाची ठिकाणे ठरविताना विश्वासात घेतले जात नाही. आपल्या सोयीच्या ठिकाणी बंधारे उभारून नाहक अनाठायी शासनाचा निधी खर्च होत असल्याबाबत संशय सदस्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षातील तब्बल ७ कोटींच्या कामाभोवती संशयाचे वारे वाहू लागले आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणलोटची कामे जिल्ह्यात होऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवतच आहे. अद्यापही जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. शेती, बागायतींसाठी पाण्याची वानवाच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामांचा दर्जा आणि खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रूपये निधीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)गेल्या पाच वर्षातील खर्चाची आकडेवारीसन २००९- १० मध्ये माती नाला बांध- ३७ लाख ५५ हजार, सिमेंट नाला बांध- ४८ लाख ६६ हजार, वळण बंधारे- ९ लाख ९९ हजार, शेततळे- २ लाख ९९ हजार असा एकूण ९९ लाख १९ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.सन २०१०- ११ मध्ये माती नाला बांध- ९१ लाख ४१ हजार, डोंगर उतार आडवे बांध- १ लाख ४५ हजार असा एकूण १ कोटी निधी खर्च झाला आहे. सन २०११- १२ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ४ लाख २५ हजार, अर्दन ट्रक्चर- ५ लाख २४ हजार, माती नाला बंधारे- १ कोटी १२ लाख २५ हजार असा मिळून १ कोटी २१ लाख ७४ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. सन २०१२-१३ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ४ लाख १२ हजार, अर्दन ट्रक्चर- १० लाख ५५ हजार, माती नाला बंधारे- १ कोटी ४ लाख ८३ हजार असा मिळून १ कोटी १९ लाख ५० हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.सन २०१३-१४ मध्ये लूज बोल्डर ट्रक्चर- ९ लाख २८ हजार, अर्दन ट्रक्चर- ३४ लाख, माती नाला बंधारे- १ कोटी ३४ लाख ३८ हजार, सिमेंट नाला बंधारे- ८४ लाख ९३ हजार, वळण बंधारे- २ लाख ४ हजार असा मिळून २ कोटी ३३ लाख ८१ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे.