शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६८% मतदान

By admin | Updated: February 21, 2017 23:19 IST

६३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार ५६५ केंद्रांवर सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे. खेड तालुक्यात मतदान केंद्रातच एका वृद्धाचा हृदयविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू, खेडकडे मतदानासाठी येताना झालेला एका मतदाराचा मृत्यू आणि असुर्डे येथे शिवीगाळ तसेच धमकावण्याच्या प्रकारामुळे काहीसे गालबोट लागले. शिवीगाळ प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणांसाठी मंगळवारी १५६५ केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ७१ हजार ८१६ मतदारांपैकी ५ लाख ७७ हजार २३२ मतदारांनी (५३.८६ टक्के) मतदान केले. यात पुरुष मतदारांची संख्या दोन लाख ७२ हजार ५२२, तर महिलांची संख्या तीन लाख चार हजार ७१० इतकी आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य मतदान केंद्रे दुर्गम भागात असल्याने सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी रात्री उशिरा मिळाली. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले असल्याचा अंदाज प्रशासकीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदान चिपळूण तालुक्यात (५८.४१ टक्के); त्याखालोखाल गुहागर तालुक्यात (५७.५४ टक्के) झाले होते. गुहागर, राजापूर, रत्नागिरी, खेड, दापोली, लांजा या तालुक्यांमध्ये मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना घडल्या. मात्र, कर्मचाऱ्यांनी तातडीने पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू राहिली. काही काळ मतदान थांबले होते.जिल्ह्यात ६३५ उमेदवार उभे आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेसाठी २२६, तर पंचायत समितीसाठी ४०९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उद्या, गुरुवारी तालुक्यांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधीहृदयविकाराच्या धक्क्याने दोघांचा मृत्यूखेड तालुक्यात सुकीवली येथे मतदानासाठी केंद्रावर गेलेले ६४ वर्षीय वृद्ध माजी सैनिक महादेव शिवराम चाळके यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. ते सकाळी ११.३० वाजता मतदान केंद्रात गेले. सुमारे तासभर रांगेत उभे होते. मात्र, मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावतानाच ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा तसेच नातवंडे असा परिवार आहे़ मुंबईमध्ये असणारे याच तालुक्यातील साखरोली गावचे रहिवासी संतोष देवजी मोरे (४३) हे मतदानासाठी म्हणून मुंबईहून खेडकडे येत होते. पोलादपूर येथे बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.