शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:26 IST

रत्नागिरी : सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला ...

रत्नागिरी : सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.३७ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानासाठी असलेली गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर, शिवसेनेचे विनायक राऊत, स्वाभिमानचे नीलेश राणे, वंचित बहुजन आघाडीचे मारुती रामचंद्र जोशी, बीआरएसपीचे राजेश जाधव, बसपचे किशोर वरक, समाजवादी फॉरवर्ड ब्लॉकचे संजय गांगनाईक, बहुजन मुक्ती पार्टीचे भिकुराम पालकर, तसेच अपक्ष विनायक लवू राऊत, पंढरीनाथ आंबेरकर, नीलेश भातडे, नारायण गवस यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघांतील १०२७, तर सिंधुदुर्गमधील तीन विधानसभा मतदारसंघांतील ९१५ अशा एकूण १९४२ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. दोन तासांत साधारणत: १० टक्के मतदान झाले. अकरा वाजेपर्यंत २१.५९ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३५.६९, ३ वाजेपर्यंत ४५.१०, तर पाच वाजेपर्यंत ५६.५२ टक्के मतदान झाले. साधारणत: दोन तासांत दहा टक्के मतदान झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार १४ लाख ५४ हजार ५२५ मतदार आहेत. यापैकी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८ लाख २२ हजार १२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदारांची संख्या ४,१०,८०० (५७.७० टक्के), तर महिला मतदारांची संख्या ४ लाख ११ हजार ३२० (५५.४० टक्के) होती. या कालावधीत एकाही तृतीयपंथी मतदाराने मतदान केले नाही.पाच वाजल्यानंतर शेवटच्या तासात काही ठिकाणी मतदारांनी गर्दी केली. त्यामुळे पुढच्या एका तासात सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत मतदान होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.रत्नागिरी केंद्र संख्या एकूण मतदार झालेले मतदान टक्केचिपळूण ३३४ २,६९,१४० १,३८,५३७ ५१.४७रत्नागिरी ३४५ २,८०,८१९ १,६५,९७२ ५९.१०राजापूर ३३८ २,३७,८४५ १,२,१००८ ५०.८८सिंधुदुर्ग/कणकवली ३३० २,२९,५२६ १,२७,९१० ५५.७३कुडाळ २७७ २,१२,६६८ १,२९,८६६ ६०.७८सावंतवाडी ३०८ २,२३,५२६ १,३८,८२७ ६२.११एकूण १०४२ १४,५४,५२४ ८,२२,१२९ ५६.५२धोपावेत पाण्यासाठी मतदानावर बहिष्काररायगड मतदारसंघातसमाविष्ट असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील, गुहागर तालुक्यातील धोपावे येथे १३00 पैकी तब्बल ९00 मतदारांनी मतदान केले नाही.२५ वर्षे आपला पाणीप्रश्न सुटला नसल्याने या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.