शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

तिलारी धरणात ६४ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: September 6, 2015 20:44 IST

धीरज साळे : गतवर्षीच्या तुलनेत कमी, मात्र स्थिती चांगली

वैभव साळकर - दोडामार्ग   गोवा आणि महाराष्ट्र राज्याचा मानबिंदू ठरलेल्या तिलारी धरणात यावर्षी ६४ टक्के पाणी साठा झाला आहे. आतापर्यंत धरणातील पाणी १०२.२७ मीटर एवढे वाढले असून ते २८७.१४८ द. ल. घ. मी. एवढे आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट अखेर धरणात झालेला पाणी साठा कमी आहे. मात्र स्थिती चांगली आहे. असा दावा तिलारीचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी केला आहे.महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या परिसरात पाऊस मुबलक प्रमाणात पडत असल्याने पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्या परिसरातील जमिनी शेतीसाठी सोयीस्कर झाल्या असून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गोवा राज्याला तिलारी धरणातून आवश्यक पाणी मिळत असल्याने गोवा राज्यातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे. तिलारी धरणाच्या मुख्य कालव्याद्वारे गोवा राज्याला पाणी पुरवठा केला जातो. डावा व उजवा या दोन कालव्यातून पेडणे गोवा व डिचोली तालुका तसेच अस्नोडा येथे या पाण्याचे शुध्दीकरण करून ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दोडामार्गात आगमन केले. जलप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे तिलारी धरणातील पाण्याची पातळी विषयी विचारणा केली असता या तिलारी धरण पात्रातील गेल्या एक महिन्याचा कालावधी पाहता सद्यस्थितीत या धरणातील पाणी १०२.२७ मीटर एवढे वाढले असून, हे पाणी जवळजवळ २८७.१४८ दशलक्षघमी एवढे असल्याचे सांगितले.तिलारी धरण सध्या चालू परिस्थितीत ६४.१८ टक्के भरलेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच या तिलारी धरणातील महालक्ष्मी जलविद्युत प्रकल्पाला ११ क्यूमी एवढे पाणी प्रत्येक दिवशी सोडण्यात येते. तसेच २०१४-१५ या वर्षीची माहिती घेतली, त्यावेळी जून, जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत २२६८.८० मिमी पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. तसेच चालू दोन महिन्यांचा कालावधी पाहता हाच पाऊस १७९१.८० मिमी झाल्याचे सांगण्यात आले. पुरेसा पाणीसाठातिलारी धरणात ६४ टक्के पाणीसाठा सध्या आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा कमी आहे. याबाबत कार्यकारी अभियंता धीरज साळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पाणीसाठा पुरेसा आहे. एकदमच स्थिती काही वाईट नाही. एवढे धरण कोरडे रहावेच लागते. संपूर्ण धरण भरूनही चालत नसल्याचे साळे म्हणाले.