शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जिल्ह्यातील ६४ टक्के गावांनी घेतला तंटामुक्तीचा श्वास

By admin | Updated: January 9, 2015 00:13 IST

अजूनही प्रमाण कमीच : केवळ १६ गावांनाच तंटामुक्त विशेष पुरस्कार, प्रसारातून दिला जाणार प्रबोधनावर भर

मेहरुन नाकाडे-रत्नागिरी -महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींपैकी ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत. तंटामुक्त होण्याचे प्रमाण ६४.९ टक्के इतके आहे. आतापर्यंत केवळ १६ गावांना तंटामुक्त विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्य शासनाने १५ आॅगस्ट २००७ रोजी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. न्यायालयीन प्रलंबित खटले निकाली काढून गावातील वाद तडजोडीने मिटवून गावात शांतता निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले. या अभियानाच्या माध्यमातून आदर्श समाजनिर्मिती करून गावाची वाटचाल ‘शांततेकडून समृध्दीकडे होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केवळ तंटे मिटविणे नव्हे; तर गावाची वाटचाल शांततेकडून समृध्दीकडे होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानातून जिल्ह्यातील ८५१ ग्रामपंचायतींपैकी ५४१ गावे तंटामुक्त झाली आहेत. २००७-०८मध्ये जिल्ह्यातील एकूण ४८ गावे तंटामुक्त झाली होती. पहिल्याच वर्षी विशेष तंटामुक्त पुरस्कारासाठी राजापूर तालुक्यातील तीन गावांची निवड करण्यात आली. त्यामध्ये कोळवणखडी, परटवली व वाले या गावांचा समावेश आहे. २००८-०९ मध्ये एकूण २४३ गावे तंटामुक्त झाली होती. पैकी ८ गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. रत्नागिरी शहर पोलीस स्थानक हद्दीतील मिरजोळे, सडामिऱ्या, शिरगाव, फणसोप, कर्ला, तर लांजा तालुक्यातील आंजणारी, राजापूर तालुक्यातील मिळंद व निवेली गावांची निवड करण्यात आली. २००९-१० मध्ये १०४ गावे तंटामुक्त झाली, तर पाच गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील मजगाव, लांजा तालुक्यातील निवसर, राजापूर तालुक्यातील कणेरी, चिखलगावचा समावेश आहे.२०१०-११ मध्ये ७२ गावे तंटामुक्त झाली. २०११-१२ मध्ये एकूण ५८, २०१२-१३ मध्ये १३ गावे तंटामुक्त, तर २०१३-१४ मध्ये ३ गावे तंटामुक्त झाली. सुरूवातीच्या तीन वर्षात केवळ १६ गावांनी विशेष पुरस्कार मिळविला. परंतु तद्नंतर सलग चार वर्षात एकही गाव विशेष पुरस्काराकरिता पात्र ठरले नाही. गावामध्ये तंटे निर्माण होऊ न देणे, तंट्याचे निराकरण करून ते कमी करणे, सार्वजनिक सण, उत्सव शांततेत साजरे करणे, गावातील सण-उत्सव पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, गावात जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करणे, आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह होत असताना गावागावात जातीय व धार्मिक सलोख्याचे कार्यक्रम घेण्यात येऊन सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. तंटामुक्त समित्यांच्या कार्याची दखल घेऊन निवड समितीतर्फे पुरस्कारासाठी निवड केली जाते. लोकसंख्येच्या निकषावर तंटामुक्त पुरस्काराची रक्कम अवलंबून आहे. परंतु ज्या गावामध्ये अन्य गावांपेक्षा वेगळे काम केले असेल त्याची दखल घेऊन ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. संबंधित गावासाठी तंटामुक्त बक्षीस रकमेपेक्षा अधिक २५ हजार रूपये देण्यात येतात. पुरस्काराच्या रकमेतून गावात विकासात्मक कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात तंटामुक्त समितीचे कार्य वेगाने व्हावे, यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांना वेगळी दिशा मिळावी, यासाठी हाती घेतलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी गावोगाव लोकांनी प्रबोधनाची दिशा हाती घेतली आहे.