शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर तालुक्यात ६० टक्के भातपिकाची नोंद

By admin | Updated: October 6, 2015 00:18 IST

नुकसानाची पाहणी : कोकणात भातपीक चांगले असल्याचा अहवाल

मार्लेश्वर : भातशेतीच्या झालेल्या नुकसानाची पीक पाहणी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या सर्व्हेवरून पुढील अनुदानाची दिशा ठरवली जाणार आहे. मात्र, शासनाचा अधिकारीवर्गच भातपीक कोकणात चांगले झाले असल्याचा अहवाल देण्याच्या मनसुब्यात आहे. संगमेश्वर तालुक्याचा विचार करता ४० ते ५० टक्केच भातपीक असताना प्रत्यक्षात याचा अहवाल वरिष्ठस्तरावर ६० टक्क्यांच्यावर देण्यात आला आहे. अनुदान देण्यापासून शासनाला परावृत्त करण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गाकडून केला जात असल्याबाबत शेतकरीवर्गात नाराजी आहे. यावर्षी आंबा, काजूचे नुकसान अवेळी पावसामुळे झाले याची दखल शासनाने घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई देऊ केली. याचप्रमाणे सध्याच्या शेती हंगामात पावसाची आवश्यकता असताना लावणीवेळी पावसाने दांडी मारल्यामुळे भातशेतीचेही नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करत भातशेतीचीही नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचाही पाठींबा शेतकऱ्यांना मिळत आहे. अखेर शासनाने याची दखल घेऊन प्रथम भातशेतीच्या पिकाचा पाहणी दौरा करून यात किती नुकसान आहे? याचा अहवाल तालुकास्तरावर प्राप्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार कृषी विभागाच्या अधिकारीवर्गाकडून हा दौरा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्याचा विचार करता या दौऱ्यातून भातशेती ४० टक्केच पिकली आहे. उर्वरित शेतीही तयार झाली आहे. यात बहुतांश पीक हे दाणा विरहित आहे. यात रोपांची वाढ खुंटली असल्याने जनावरांच्या सुक्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. भातपीक दौरा अधिकारीवर्गाने पूर्ण केला आहे. यात भातपीक तालुक्यात ४० टक्केच असल्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवण्यात आला आहे. मात्र, वरिष्ठस्तरावरून हा अहवालाचा आकडा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठस्तरावरून तालुक्यातील भातपीक ६० टक्क्यांच्यावर असल्याचा अहवाल पाठवण्याच्या तोंडी सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यांतून या सूचनेनुसार तसा अहवाल पाठवण्यात आला आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्याने वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे कठीण होणार असल्याचे दिसत आहे. जिल्हास्तरावरील अधिकारी शेतकऱ्यांना भातशेतीची नुकसान भरपाई मिळू नये, अशा विचाराने काम करत आहेत, असा आरोप शेतकरीवर्गातून केला जात आहे. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केल्यास त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महसूल विभागाला कामाला लावावी लागणार, हा त्रास वाचवण्यासाठीच खोटा अहवाल शासनाला सादर करण्याचा मनसुबा रचला जात असल्याचा आरोप होत आहे. (वार्ताहर)