शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
4
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
5
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
6
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
7
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
8
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
9
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
10
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
11
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
12
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
13
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
14
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
15
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
16
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
17
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
18
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
19
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
20
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?

संगमेश्वर तालुक्यात ६० टक्के भातपिकाची नोंद

By admin | Updated: October 6, 2015 00:18 IST

नुकसानाची पाहणी : कोकणात भातपीक चांगले असल्याचा अहवाल

मार्लेश्वर : भातशेतीच्या झालेल्या नुकसानाची पीक पाहणी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या सर्व्हेवरून पुढील अनुदानाची दिशा ठरवली जाणार आहे. मात्र, शासनाचा अधिकारीवर्गच भातपीक कोकणात चांगले झाले असल्याचा अहवाल देण्याच्या मनसुब्यात आहे. संगमेश्वर तालुक्याचा विचार करता ४० ते ५० टक्केच भातपीक असताना प्रत्यक्षात याचा अहवाल वरिष्ठस्तरावर ६० टक्क्यांच्यावर देण्यात आला आहे. अनुदान देण्यापासून शासनाला परावृत्त करण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गाकडून केला जात असल्याबाबत शेतकरीवर्गात नाराजी आहे. यावर्षी आंबा, काजूचे नुकसान अवेळी पावसामुळे झाले याची दखल शासनाने घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई देऊ केली. याचप्रमाणे सध्याच्या शेती हंगामात पावसाची आवश्यकता असताना लावणीवेळी पावसाने दांडी मारल्यामुळे भातशेतीचेही नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करत भातशेतीचीही नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचाही पाठींबा शेतकऱ्यांना मिळत आहे. अखेर शासनाने याची दखल घेऊन प्रथम भातशेतीच्या पिकाचा पाहणी दौरा करून यात किती नुकसान आहे? याचा अहवाल तालुकास्तरावर प्राप्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार कृषी विभागाच्या अधिकारीवर्गाकडून हा दौरा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्याचा विचार करता या दौऱ्यातून भातशेती ४० टक्केच पिकली आहे. उर्वरित शेतीही तयार झाली आहे. यात बहुतांश पीक हे दाणा विरहित आहे. यात रोपांची वाढ खुंटली असल्याने जनावरांच्या सुक्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. भातपीक दौरा अधिकारीवर्गाने पूर्ण केला आहे. यात भातपीक तालुक्यात ४० टक्केच असल्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवण्यात आला आहे. मात्र, वरिष्ठस्तरावरून हा अहवालाचा आकडा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठस्तरावरून तालुक्यातील भातपीक ६० टक्क्यांच्यावर असल्याचा अहवाल पाठवण्याच्या तोंडी सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यांतून या सूचनेनुसार तसा अहवाल पाठवण्यात आला आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्याने वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे कठीण होणार असल्याचे दिसत आहे. जिल्हास्तरावरील अधिकारी शेतकऱ्यांना भातशेतीची नुकसान भरपाई मिळू नये, अशा विचाराने काम करत आहेत, असा आरोप शेतकरीवर्गातून केला जात आहे. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केल्यास त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महसूल विभागाला कामाला लावावी लागणार, हा त्रास वाचवण्यासाठीच खोटा अहवाल शासनाला सादर करण्याचा मनसुबा रचला जात असल्याचा आरोप होत आहे. (वार्ताहर)