शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
4
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
5
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
6
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
7
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
8
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
9
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
10
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
11
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
12
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
13
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
14
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
15
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
16
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
17
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
18
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
19
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!

संगमेश्वर तालुक्यात ६० टक्के भातपिकाची नोंद

By admin | Updated: October 6, 2015 00:18 IST

नुकसानाची पाहणी : कोकणात भातपीक चांगले असल्याचा अहवाल

मार्लेश्वर : भातशेतीच्या झालेल्या नुकसानाची पीक पाहणी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या सर्व्हेवरून पुढील अनुदानाची दिशा ठरवली जाणार आहे. मात्र, शासनाचा अधिकारीवर्गच भातपीक कोकणात चांगले झाले असल्याचा अहवाल देण्याच्या मनसुब्यात आहे. संगमेश्वर तालुक्याचा विचार करता ४० ते ५० टक्केच भातपीक असताना प्रत्यक्षात याचा अहवाल वरिष्ठस्तरावर ६० टक्क्यांच्यावर देण्यात आला आहे. अनुदान देण्यापासून शासनाला परावृत्त करण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गाकडून केला जात असल्याबाबत शेतकरीवर्गात नाराजी आहे. यावर्षी आंबा, काजूचे नुकसान अवेळी पावसामुळे झाले याची दखल शासनाने घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई देऊ केली. याचप्रमाणे सध्याच्या शेती हंगामात पावसाची आवश्यकता असताना लावणीवेळी पावसाने दांडी मारल्यामुळे भातशेतीचेही नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करत भातशेतीचीही नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचाही पाठींबा शेतकऱ्यांना मिळत आहे. अखेर शासनाने याची दखल घेऊन प्रथम भातशेतीच्या पिकाचा पाहणी दौरा करून यात किती नुकसान आहे? याचा अहवाल तालुकास्तरावर प्राप्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार कृषी विभागाच्या अधिकारीवर्गाकडून हा दौरा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्याचा विचार करता या दौऱ्यातून भातशेती ४० टक्केच पिकली आहे. उर्वरित शेतीही तयार झाली आहे. यात बहुतांश पीक हे दाणा विरहित आहे. यात रोपांची वाढ खुंटली असल्याने जनावरांच्या सुक्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. भातपीक दौरा अधिकारीवर्गाने पूर्ण केला आहे. यात भातपीक तालुक्यात ४० टक्केच असल्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवण्यात आला आहे. मात्र, वरिष्ठस्तरावरून हा अहवालाचा आकडा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठस्तरावरून तालुक्यातील भातपीक ६० टक्क्यांच्यावर असल्याचा अहवाल पाठवण्याच्या तोंडी सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यांतून या सूचनेनुसार तसा अहवाल पाठवण्यात आला आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्याने वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे कठीण होणार असल्याचे दिसत आहे. जिल्हास्तरावरील अधिकारी शेतकऱ्यांना भातशेतीची नुकसान भरपाई मिळू नये, अशा विचाराने काम करत आहेत, असा आरोप शेतकरीवर्गातून केला जात आहे. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केल्यास त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महसूल विभागाला कामाला लावावी लागणार, हा त्रास वाचवण्यासाठीच खोटा अहवाल शासनाला सादर करण्याचा मनसुबा रचला जात असल्याचा आरोप होत आहे. (वार्ताहर)