शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा ५ रोजी मंत्रालयावर मोर्चा

By admin | Updated: March 30, 2016 23:53 IST

परूळेकर यांची माहिती : बजेटमध्ये गतवर्षीपेक्षा २ हजार कोटींची कपात

कुडाळ : केंद्र व राज्य सरकारने महिला व बालकल्याणच्या बजेटमध्ये वाढ केलीच नसल्याने मागील वर्षाच्या तुलनेत २ हजार २२८ कोटी रुपयांची कपात केल्यामुळे पुढच्या वर्षातही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वेळेवर मिळण्याची शक्यता अंधुक आहे. याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने राज्यव्यापी मोर्चा मुंबई मंत्रालयावर ५ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे, अशी माहिती सभेच्या जनरल सक्रेटरी कमल परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. या प्रसिद्धीपत्रकात कमल परुळेकर म्हणाल्या की, सन २०१५-१६ ला राज्याने महिला व बालकल्याणसाठी ३५६८ कोटी रुपये बजेट केले होते. त्याआधी काँग्रेस सरकारने मानधन वाढ जाहीर केली. मात्र, परत पैशांची तरतूदच न केल्यामुळे यावर्षी ती वाढ देताना भाजप शिवसेना सरकारच्या नाकीनऊ आले. त्यातून काही शहाणपणा घेण्याऐवजी या सरकारने यावर्षी २०१६-२०१७ च्या बजेटमध्ये महिला बालकल्याण विभागातही फक्त १३४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये ६२ टक्के कपात करून सरकारला या योजनेचा गळा तर घोटायचा नाही ना? असा सवाल कमल परूळेकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)बँक मॅनेजरला विचारणा कराजिल्हा मध्यवर्ती बँकेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचे मानधन अ‍ॅडव्हान्स देण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत अनेक अंगणवाडी कर्मचारी विचारणा करीत असल्यामुळे त्यांच्या माहितीसाठी कमल परुळेकर यांनी सांगितले की, पगार अ‍ॅडव्हान्स घेतल्यापासून पहिले १५ दिवस आय.बी.पी योजनेखाली व्याज बँक घेणार नाही. तरी १६ व्या दिवसापासून अकरा टक्के व्याज सुरु होईल व १ पगार फिटेपर्यंत जे जे पैसे बँक खात्यात जमा होतील ते अ‍ॅडव्हान्स पगारापोटी बँक फेडून घेत राहील. सोसायटी हप्ता, विमा हप्ता जावून जे पैसे शिल्लक राहतील ते पुढचे काही महिने अ‍ॅडव्हान्सपोटी बँक फेडून घेत राहील, त्यामुळे पुढचे काही महिने मानधनाअभावीच रहावे लागेल. या सर्वांचा विचार करूनच जिल्हा बँकेशी व्यवहार करावा. शाखा मॅनेजरना नियम व कार्यपद्धती विचारावी, असे परुळेकर म्हणाल्या.आझाद मैदानावर जमावेबजेटवर १३ एप्रिलपर्यंत चर्चा सुरु आहे. म्हणूनच ५ एप्रिलला मंगळवारी पुन्हा एकदा सर्व संघटनांनी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. सोमवार ४ एप्रिलला मुंबईतील संघटना आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत व राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मंगळवार ५ एप्रिलला मुंबईत जमून कृती समितीने मोर्चा ठरविला आहे. त्यासाठी सिंधुदुर्गातून सेविका व मदतनिसांनी ५ तारखेस १० वाजेपर्यंत मुंबईत आझाद मैदानावर जमावे, असे आवाहन परुळेकर यांनी केले आहे.