शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

‘रत्नागिरी गॅस’मधून आता ५०० मेगावॅट वीजनिर्मिती

By admin | Updated: January 23, 2016 23:49 IST

रेल्वेकडून वीज खरेदी : झारखंड, पश्चिम बंगाललाही वीजपुरवठा

गुहागर : रत्नागिरी गॅस प्रकल्पातून गेले दोन महिने ३०० मेगावॅट वीजनिर्मिती सातत्याने सुरू आहे. त्यानंतर आता झारखंड व पश्चिम बंगालला वीज पाठविण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता रेल्वेने केली आहे. त्यामुळे २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजल्यांपासून वीजनिर्मितीत २०० मेगावॅटची वाढ होऊन आता ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस प्रकल्पातून २६ नोव्हेंबरला वीजनिर्मिती सुरू झाली. २१५० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात होता. महाराष्ट्रातील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी बंद प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. अनेक संकटांवर मात करून प्रकल्पातून सरासरी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सकडून होणाऱ्या गॅसपुरवठ्यावर तयार होणारी महागडी वीज घेण्यास कोणीही तयार नसल्याने डिसेंबर २०१३ पासून प्रकल्पातील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद होती. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पहिल्यांदा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरूकरणार, अशी घोषणा केली आणि त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ५०० मेगावॅट वीजनिर्मिती खरेदीला रेल्वेकडून हिरवा कंदील मिळाला. यासाठी दिल्ली येथील विशेष समितीने प्रकल्पाला भेट दिली. रत्नागिरी गॅस प्रकल्पातून वीज घेण्यास सेंट्रल इलेक्ट्रिकल रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (सीईआरए) परवाना मिळाल्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनची नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली. यानंतर महाराष्ट्र रेल्वेसाठी ३०० मेगावॅट वीजनिर्मिती टप्पा-३ मधून सुरू करण्यात आली. झारखंड व पश्चिम बंगालला वीज पाठविण्यासाठी रेल्वेला परवाना मिळणे आवश्यक असल्याने गेले दोन महिने या तांत्रिक मंजुरी मिळविण्यात गेले. याबाबत रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडे आदेश प्राप्त झाल्यानंतर २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजल्यांपासून टप्पा-२ (बी)मधून २०० मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात झाली. आता या प्रकल्पातून ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.