शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

‘रत्नागिरी गॅस’मधून आता ५०० मेगावॅट वीजनिर्मिती

By admin | Updated: January 23, 2016 23:49 IST

रेल्वेकडून वीज खरेदी : झारखंड, पश्चिम बंगाललाही वीजपुरवठा

गुहागर : रत्नागिरी गॅस प्रकल्पातून गेले दोन महिने ३०० मेगावॅट वीजनिर्मिती सातत्याने सुरू आहे. त्यानंतर आता झारखंड व पश्चिम बंगालला वीज पाठविण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता रेल्वेने केली आहे. त्यामुळे २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजल्यांपासून वीजनिर्मितीत २०० मेगावॅटची वाढ होऊन आता ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस प्रकल्पातून २६ नोव्हेंबरला वीजनिर्मिती सुरू झाली. २१५० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात होता. महाराष्ट्रातील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी बंद प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. अनेक संकटांवर मात करून प्रकल्पातून सरासरी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. रिलायन्सकडून होणाऱ्या गॅसपुरवठ्यावर तयार होणारी महागडी वीज घेण्यास कोणीही तयार नसल्याने डिसेंबर २०१३ पासून प्रकल्पातील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद होती. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी पहिल्यांदा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरूकरणार, अशी घोषणा केली आणि त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ५०० मेगावॅट वीजनिर्मिती खरेदीला रेल्वेकडून हिरवा कंदील मिळाला. यासाठी दिल्ली येथील विशेष समितीने प्रकल्पाला भेट दिली. रत्नागिरी गॅस प्रकल्पातून वीज घेण्यास सेंट्रल इलेक्ट्रिकल रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (सीईआरए) परवाना मिळाल्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनची नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली. यानंतर महाराष्ट्र रेल्वेसाठी ३०० मेगावॅट वीजनिर्मिती टप्पा-३ मधून सुरू करण्यात आली. झारखंड व पश्चिम बंगालला वीज पाठविण्यासाठी रेल्वेला परवाना मिळणे आवश्यक असल्याने गेले दोन महिने या तांत्रिक मंजुरी मिळविण्यात गेले. याबाबत रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडे आदेश प्राप्त झाल्यानंतर २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजल्यांपासून टप्पा-२ (बी)मधून २०० मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात झाली. आता या प्रकल्पातून ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.