शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सिंधुदुर्गातील ४४ गावे माळीणसारखी!

By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST

डोंगरानजीकच्या गावांचा सर्व्हे : प्रशासनाकडून २३६६ कुटुंबांतील ८९८२ लोकांना धोका असल्याचे स्पष्ट

सिंधुदुर्गनगरी : माळीण गावच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने डोंगरानजीक असणाऱ्या गावांचा सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल ४४ गावे ही दरडप्रवण (दरडीखाली वसलेली) क्षेत्र म्हणून प्रशासनाने निश्चित केली आहेत. ‘त्या’ गावातील २३६६ कुटुंबांतील सुमारे ८९८२ लोकांना भविष्यात दरडीचा धोका संभवण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगावमधील माळीण गावावर पहाटे गाढ झोपेत असताना गावावर डोंंगर कोसळून शेकडो जणांचे प्राण गेले होते. संपूर्ण गाव डोंगराखाली गाडला गेला होता. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या भागातील गावांचा सर्व्हे करावा व तसा अहवाल शासनास सादर करावा असे आदेश राज्य शासनाच्यावतीने देण्यात आले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने सर्व गावांचा सर्व्हे करून जिल्ह्यात ‘माळीण’सारखी परिस्थिती नसल्याचा अहवाल शासन स्तरावर सादर करण्यात आला होता. मात्र दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील ४४ गावे ही डोंगराच्या पायथ्याशी वसलेली असून भविष्यात ‘त्या’ घरांना धोका संभावण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे.माळीणच्या घटनेनंतर सारेच धास्तावले आहेत. कित्येक वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील एका गावामध्ये डोंगर खचल्याचा काहीसा प्रकार घडला होता. माळीणच्या भीतीने प्रशासनाने डोंगरकपारीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या वस्तीचे आणि डोंगराच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांमार्फत प्रत्येक गावागावाचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार तब्बल ४४ गावे ही डोंगरपायथ्याशी वसलेली असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. या जिल्ह्यामधील वैभववाडी, सावंतवाडी व मालवण या तीन तालुक्यातील तब्बल २५४८ कुटुंबातील ८९८२ लोकांना भविष्यात दरडीचा धोका संभवण्याचा अंदाजही प्रशासनाच्यावतीने वर्तविण्यात आला असून त्या दृष्टीने संबंधितांनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहितीदेखील देण्यात आली आहे. कोकण हा प्रामुख्याने सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील उतारावर वसलेला प्रदेश आहे. येथील मातीही अतिशय कमकुवत, अपरिपक्व, भूगर्भातील कातळाशी एकजीव न झालेली आहे. परिणामी मातीमध्ये मुरणारे पावसाचे पाणी थेट कातळापर्यंत जाऊन पाण्याचा अंतर्गत प्रवाह सुरु होतो आणि मातीचा स्तर ढासळू लागतो. काही अवधीनंतर ही माती पाण्याच्या दाबाने खाली घसरून पडते असे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. तसेच जंगल संपत्तीवर घाला घालण्याचे प्रयत्न सुरु असल्याने पावसाच्या प्रचंड पाण्याला डोंगराच्या भूपृष्ठावर अडविण्याचा आधारच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे या मातीला घट्ट धरून ठेवणारे वृक्ष आणि वनस्पती आवश्यक त्या प्रमाणात भूपृष्ठावर शिल्लकच राहिलेल्या नाहीत. मालवण तालुक्यातील तीन गावे, वैभववाडीतील २५ गावे, सावंतवाडी तालुक्यातील १६ गावे अशी एकूण ४४ गावे ही दरड प्रवण गाव म्हणून प्रशासनाच्यावतीने निश्चित करण्यात आली आहेत.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाच्या सूचनादरम्यान, संबंधित गावांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्यावतीने काही सूचना केल्या आहेत. यामध्ये संबंधित दरडप्रवण गावांनी डोंगर स्तरावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. पाण्याचा निपटारा होण्यासाठी चर खणणे, वृक्षांची लागवड करणे, गवताची लागवड करणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे अशा उपायांनी दरड कोसळण्याच्या समस्येवर बऱ्याच प्रमाणात मात करता येईल.गिरीष परब