शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नुकसानभरपाईच्या ४४ लाखांचे वितरण

By admin | Updated: September 26, 2015 00:22 IST

आंबा, काजू : कणकवली तालुक्यातील बागायतदारांचा समावेश

कणकवली : आंबा तसेच काजू नुकसानभरपाईपोटी शासनाकडून कणकवली तालुक्याला ६ कोटी २ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी ४३ लाख ९३ हजार ५३८ रुपयांची नुकसानभरपाई गुरुवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे, तर ६ लाख २१ हजार रुपयांची देयके ट्रेझरीकडे जमा करण्यात आली आहेतनैसर्गिक आपत्तीमुळे कणकवली तालुक्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. आंबा तसेच काजू बागयतदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीला सामोरे जावे लागले होते. तर अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे बगायतदारांना तसेच शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. या पार्श्वभूमिवर शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. ही नुकसान भरपाईची रक्कम आता प्राप्त झाली आहे. महत्प्रयासाने नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आंबा तसेच काजू नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महसूल तसेच कृषि विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. कणकवली तहसील कार्यालयाकडून गुरुवारपर्यंत सुमारे ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात या कामाला आणखीन वेग येणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर वितरीत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले. (वार्ताहर)बागायतदारांना दिलासासिंधुदुर्ग जिल्ह्याचे अर्थकारण बहुतांश आंबा तसेच काजू उत्पादनावर अवलंबून आहे. मात्र, अलीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस तसेच हवामानातील वरचेवर होणारे बदल याचा फटका शेतकरी तसेच बागायतदारांना बसत आहे. पर्यायाने बगायतदारांबरोबरच जिल्ह्याच्या अर्थकारणावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे काहीसा दिलासा बागायतदारांना मिळाला आहे.