शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ४३६ कुटुंब शौचालयाविना

By admin | Updated: September 11, 2015 23:39 IST

प्रत्येक शौचालयासाठी शासनाकडून १७ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पालिकेच्या मालकीची काही शौचालये नादुरुस्त आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील ४३६ कुटुंबांकडे स्वतंत्र शौचालये नाहीत. ही कुटुंब सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. त्यापैकी १७२ कुटुंबांकडून स्वतंत्र शौचालय बांधकामाकरिता परवानगी मागणारे अर्ज पालिकेकडे आले असून, त्यांना परवानगी दिली जाणार आहे. या सर्वच कुटुंबांना शौचालये उभारण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी दिली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही जिल्ह्यातील या सार्वजनिक संस्थांचे मुख्याधिकारी व या योजनेचे सचिव यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यात शासनाचे योजना सचिव सुधाकर बोबडे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी खोडके हे उपस्थित होते. शहराचा काही भाग हा किनारपट्टी भागालगत आहे. मात्र, या भागासह शहरातील सर्वच भागात पालिकेने उभारलेली ३६१ सार्वजनिक शौचालये आहेत. असे असतानाही किनाऱ्यावर घाण करण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. त्याबाबत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सामाजिक संस्थांची मदत घेतली जात आहे. शहरातील ज्या ४३६ कुटुंबांना स्वतंत्र शौचालये उभारण्याची परवानगी दिली जाणार आहे, त्यांना प्रत्येक शौचालयासाठी शासनाकडून १७ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पालिकेच्या मालकीची काही शौचालये नादुरुस्त आहेत. या सर्वच शौचालयांची पाहणी आपण शुक्रवारपासून सुरू केली असून, काही शौचालयांच्या दुरुस्तीबाबतची अंदाजपत्रकेही तयार करण्यात आल्याचेही खोडके यांनी सांगितले. शहरातील ज्या ज्या शौचालयांची दुरुस्ती आवश्यक आहे तेथे लवकरात लवकर दुरूस्ती केली जाणार आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा गांधी जयंतीपूर्वी स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्यासाठी शासकीय स्तरावर जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायती व पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथे गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु दोन्ही जिल्ह्यातील शौचालयांची संख्या, अपूर्ण कामे पाहता ही घोषणा गांधी जयंतीपूर्वी होईल काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील काही झोपडपट्टी भागात शौचालयांची समस्या बिकट आहे. त्याठिकाणी झोपडीवासीयांची स्वत:ची जागा नसल्याने त्यांना शौचालये उभारता आली नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणीही शासकीय योजनेतून शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. साळवी स्टॉप येथील झोपडपट्टीवासीयांची स्वत:ची जमीन नसल्याने त्याठिकाणी या लोकांसाठी नगर पालिका ८ सीटचे शौचालय उभारून झोपडपट्टीवासीयांची गैरसोय दूर करणार आहे.