शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

रत्नागिरीपर्यंत ४ नव्या गाड्या हव्यात : मेहता

By admin | Updated: June 11, 2015 00:30 IST

कोकणच्या तोंडाला पाने : सुरेश प्रभू यांना निवेदन

चिपळूण : कोकण रेल्वे कोकणातून जात असली तरी कोकणातील प्रवाशांना तिचा फारसा लाभ होत नाही. सातत्याने मागणी करुनही गाड्यांची संख्याही वाढवली जात नाही. शिवाय एक्सप्रेस गाड्यांना थांबाही दिला जात नाही. त्यामुळे रत्नागिरीसाठी नवीन ४ गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी हिरालाल मेहता यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. चिपळूण रेल्वे स्टेशनवरुन दररोज २२१२ प्रवासी प्रवास करतात. यातील १७१८ प्रवासी विनाआरक्षित, तर ४९४ प्रवासी आरक्षण घेऊन प्रवास करतात. प्रवाशांची संख्या बघून ४० गाड्यांना चिपळूण स्टेशनवर थांबा दिलेला आहे. याशिवाय या मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांना वेगवेगळ्या स्टेशनवर थांबा देण्यात आलेला आहे. भविष्याचा विचार करता चिपळूण रेल्वे स्टेशनला दिलेल्या गाड्यांची संख्या ही पुरेशी आहे. तसेच चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्ग २०१५-१६च्या रेल्वे अर्थसंकल्पात समाविष्ट आहे. या मार्गाचे विस्तृत सर्व्हेक्षण झाले आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे सुरू झाल्यापासून कोकणातून कोणतीही नवीन गाडी सुरू झालेली नाही. कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांना डबे वाढविण्याची मागणीही सध्या अनिवार्य आहे, असे कोकण रेल्वेचे महाप्रबंधक सिध्देश्वर तेलगू यांनी मेहता यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तेलगू यांच्या पत्रानुसार कोकण रेल्वे मार्गावर नवीन बदल किंवा जादा थांबे, जादा डबे या गोष्टी दुरापास्त आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रत्नागिरी ते सीएसटी दरम्यान चार नवीन गाड्या मंजूर कराव्यात, अशी मागणी येथील कोकणी जनतेतून करण्यात येत आहे. त्यामध्ये रत्नागिरी-पुणे, रत्नागिरी-वसईरोड, मडगाव-वसईरोड, मडगाव- मुंबई एक्स्प्रेस अशा गाड्या असाव्यात, अशी मागणी मेहता यांनी केली आहे. या नवीन गाड्या सुरु झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना किंवा बाहेरुन रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याचे रडगाणे कायम. चिपळूण रेल्वे स्टेशनवरून दररोज करतात २२१२ प्रवासी प्रवास. ४० गाड्यांना चिपळूण रेल्वे स्टेशनवर थांबा.चिपळूण कऱ्हाड रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण त्यादृष्टीने बोलके. गाड्यांची संख्या दाखवण्यात आलेय पुरेशी.