शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

सावंतवाडीत वर्षभरात ३५ चोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 00:52 IST

एकालाही अटक नाही : पोलिसांची अकार्यक्षमता उघड, नागरिकांचा विश्वास उडाला

प्रसन्न राणे / सावंतवाडी शहरात चोरांच्या उच्छाद वाढला असून येथील नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एका वर्षात शहरात सुमारे ३५ चोऱ्या झाल्याअसून आतापर्यंत पोलीसांना एकाही आरोपीस अटक करण्यात यश आले नाही. पोलीसांची ही कुचकामी यंत्रणा पाहून येथील चोरही आता निर्ढावलेले आहे. एकाच दिवशी एक नव्हे, तर सलग पाच-सहा फ्लॅट फोडून लाखांचा मुद्देमाल लंपास करत आहेत. यामुळे नागरिकांचाही पोलीसांवरील विश्वास उडाला असून चोरी झाली असली तरी काहीजण तक्रार नोंदीवण्यास पुढे येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या दोन रात्री घडलेल्या चोरांचा उच्छादांनी शहरवासी भयभीत झाले आहेत. शनिवारी (दि. १३) मध्यरात्री व रविवारी (दि.१४) मध्यरात्री चोरांनी एकुण ९ ठिकाणचे बंद फ्लॅट व दुकाने फोडून एकुण १० लाखांचा माल लंपास केला. पोलीसांनी या घटनेकडे गांभीऱ्यांने पाहणे आवश्यक आहे. पेट्रोलिंग नावापुरतेच शहरातील गस्तीच्यावेळी मोठी पोलीस व्हॅनचा वापर केला जातो. ही व्हॅन गल्ली-बोळातून कधीच फिरत नाही. काही मुख्य ठिकाणीच उभी असते. पोलीस व्हॅनमधून उतरून भरकटणाऱ्या नागरिकांची साधी चौकशीदेखील करताना दिसत नाही. हे चित्र बदलायला हवे. गस्तीला सहाच पोलीस शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता रात्रीच्या गस्तीला असणारे सहा पोलीस ही संख्या खूपच कमी आहे. हे पोलीस शहरातील मुख्य ठिकाणीच गस्त घालत असतात व गल्ली-बोळातील नागरिकांची सुरक्षा टांगणीवर असते. मंगळवारी चोरीच्या घटना अधिक मंगळवार हा शहराचा आठवडयाचा बाजाराचा दिवस आहे. या दिवशी महिलांच्या गळ्यातील सोने पळविण्याचे व पाकिट मारण्याच्या घटना अधिक घडतात. याकडे पोलीस यंत्रणेचे कायमच दुर्लक्ष राहिले आहे. पोलीस बंदोबस्तास एकच पोलीस असल्याकारणाने चोरीचे प्रकार होताना दिसते. चोरीच्या घटनास्थळी काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज चोरट्यांचे सापडूनही अद्यापही एकाही चोराला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. आंबोली येथे कॉन्स्टेबल संजय खाडे यांच्या चानाक्षपणामुळे २९ नोव्हेंबर २०१४ रोजी चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलीसांना यश आले होते. दोघे संशयित सायकलवरून एक पिशवी घेऊन जात होते. त्यावेळी कॉन्स्टेबल खाडे यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या पिशवीत देवळातील घंटा सापडल्या. पोलीसी दणका दिल्यानंतर त्यांनी आणखी काही चोरांचे नावे सांगितले. पोलीस संख्या अपुरी सावंतवाडी तालुक्याची २५००० लोकसंख्या असून यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस हेडकॉन्स्टेबल व ८२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. याच ठाण्याकडे माजगाव, कोलगाव, आरोंदा, सातार्डा, तळवडे, मळगाव, आंबोली, कलंबिस्त गावांचीही सुरक्षा आहे. या बंदोबस्तासह सावंतवाडीच्या १५००० लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी पोलीस संख्या अपूरी आहे. ४आतापर्यंत झालेल्या चोरीप्रकरणी कधीही ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास यश मिळालेले नाहीच. श्वान हे नेहमीच चोरीच्या घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळतच राहिले आहेत.