शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

३०० हेक्टर भातशेती पाण्याखाली

By admin | Updated: August 6, 2016 00:21 IST

जिल्ह्यात संततधार सुरुच : वेंगुर्ले, वैभववाडीला सर्वाधिक फटका

ओरोस : जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहू लागले असून पाणी नदीपात्राबाहेर पडून भात शेतीत घुसले आहे. अशी एकूण ३०० हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यात वेंगुर्ले आणि वैभववाडी तालुक्यातील भात शेतीला जास्त झळ बसली आहे. सध्या ही पाऊस पडत असल्याने हे पाणी भातशेतीतून ओसरू शकत नाही. त्यामुळे भात शेती बाद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १ जूनपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला. १९ जून पासून मान्सून दाखल झाला. या पावसाचे आगमन झाल्यापासून तो अविश्रांत कोसळत आहे. मागच्या दोन महिन्यातच पावसाने गतवर्षीची सरासरी गाठली. मात्र या सर्वात शेतकरी बांधवांची भातशेतीची लावणी करताना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे दरवर्षी नागपंचमी पर्यंत किंवा त्यानंतर उशीरापर्यंत भातशेती लागवडीची असणारी धावपळ यावर्षीतरी किमान थांबली व वीस दिवस अगोदरच भातशेतीची लावण पूर्ण झाली. भातशेतीची लावणी पूर्ण झाली असली तरीही, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या पीकावर विपरित परिणाम होत आहे. शेकडो एकर शेती, पाण्याखाली गेली आहे. नदीनाल्यांच्या किनाऱ्यावर असलेली ३०० हेक्टर पीके यावेळी पाण्याखाली गेली आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपेक्षा अधिक पाणी साचल्याने काही दिवसानंतर भात शेतीचे नुकसान होणार आहे. हे भात क्षेत्र खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबत लेखी पत्र पाठवले आहे. पाण्याखाली गेलेल्या भातशेतीची पंचयादी घालावी. ही शेती बाद झाल्यास पंचनामे शासनाला सादर करून नुकसान भरपाई मागता येईल, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)पावसामुळे होणार नुकसानयाबाबत कृषी विभागाचे सांख्यिकी अधिकारी अरूण नातू म्हणाले की, गेल्या १५ दिवसांपासून भात शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर भातशेतीचे भवितव्य निश्चितच धोक्यात येणार आहे. अळ्यांपासून काळजी घ्याभात पीकांवर यावर्षी पाने गुंडाळणारी अळी किंवा निळे भुंगरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणास कृषी विभागाशी किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधून औषधांची फवारणी करावी असे आवांहन कृषी विद्यालय केंद्राच्या नोडल आॅफिसर यांनी केले आहे.