शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

३०० हेक्टर भातशेती पाण्याखाली

By admin | Updated: August 6, 2016 00:21 IST

जिल्ह्यात संततधार सुरुच : वेंगुर्ले, वैभववाडीला सर्वाधिक फटका

ओरोस : जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहू लागले असून पाणी नदीपात्राबाहेर पडून भात शेतीत घुसले आहे. अशी एकूण ३०० हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यात वेंगुर्ले आणि वैभववाडी तालुक्यातील भात शेतीला जास्त झळ बसली आहे. सध्या ही पाऊस पडत असल्याने हे पाणी भातशेतीतून ओसरू शकत नाही. त्यामुळे भात शेती बाद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १ जूनपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला. १९ जून पासून मान्सून दाखल झाला. या पावसाचे आगमन झाल्यापासून तो अविश्रांत कोसळत आहे. मागच्या दोन महिन्यातच पावसाने गतवर्षीची सरासरी गाठली. मात्र या सर्वात शेतकरी बांधवांची भातशेतीची लावणी करताना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे दरवर्षी नागपंचमी पर्यंत किंवा त्यानंतर उशीरापर्यंत भातशेती लागवडीची असणारी धावपळ यावर्षीतरी किमान थांबली व वीस दिवस अगोदरच भातशेतीची लावण पूर्ण झाली. भातशेतीची लावणी पूर्ण झाली असली तरीही, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या पीकावर विपरित परिणाम होत आहे. शेकडो एकर शेती, पाण्याखाली गेली आहे. नदीनाल्यांच्या किनाऱ्यावर असलेली ३०० हेक्टर पीके यावेळी पाण्याखाली गेली आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपेक्षा अधिक पाणी साचल्याने काही दिवसानंतर भात शेतीचे नुकसान होणार आहे. हे भात क्षेत्र खराब होऊन शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबत लेखी पत्र पाठवले आहे. पाण्याखाली गेलेल्या भातशेतीची पंचयादी घालावी. ही शेती बाद झाल्यास पंचनामे शासनाला सादर करून नुकसान भरपाई मागता येईल, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)पावसामुळे होणार नुकसानयाबाबत कृषी विभागाचे सांख्यिकी अधिकारी अरूण नातू म्हणाले की, गेल्या १५ दिवसांपासून भात शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर भातशेतीचे भवितव्य निश्चितच धोक्यात येणार आहे. अळ्यांपासून काळजी घ्याभात पीकांवर यावर्षी पाने गुंडाळणारी अळी किंवा निळे भुंगरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणास कृषी विभागाशी किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधून औषधांची फवारणी करावी असे आवांहन कृषी विद्यालय केंद्राच्या नोडल आॅफिसर यांनी केले आहे.