शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटी रूपयांच्या पीक कर्जाची उचल

By admin | Updated: August 9, 2014 00:38 IST

५00 बागायतदारांचा समावेश : देवगड तालुक्यातील आंबा लागवड

पुरळ : देवगड तालुक्यामध्ये आंबा बागायतदारांनी विविध बँकांकडून सुमारे २५ कोटीचे आंबा पीक कर्जाची उचल केली असून सुमारे ५०० आंबा बागायतदारांच्या सात-बारावर आंबा पीक कर्जाच्या बोजाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. बँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून १० कोटीचे आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. आंबा पीक कर्जाच्या व्याजाला सवलत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी कर्ज घेत असल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासाठी शासनाच्या अनेक कर्ज सवलती योजना आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीकोनातून विविध बँकांनी कर्ज पुरवठा करीत आहेत. देवगड तालुक्यामध्ये सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा कलम लागवड आहे. यावर्षी म्हणजेच सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात बँक आॅफ इंडिया देवगड, मिठबाव, शिरगाव, तळेबाजार, वाडा, पडेल, विजयदुर्ग या शाखांमधून सुमारे १० कोटीचे आंबा पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. आंबा पीक कर्जाला व्याज सवलत आहे. पंजाबराव देशमुख या योजनेतून आंबा पीक कर्जाला व्याज सवलत देण्यात येते. शेतकऱ्यांना सधन बनविण्याच्या दृष्टीकोनातून बँक आॅफ इंडिया सवलतीपर कर्ज देऊन प्रयत्न करीत आहे. देवगड तालुक्यामध्ये आंबा बागायतदारांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून व दलालांच्या कर्जाच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी पुढाकार घेऊन सर्वप्रथम प्रत्येक वर्षाला २५ ते ३० कृषी मेळाव्याचे आयोजन करून कृषीविषयक कर्जाची माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रगतशील बनविण्याच्या मार्गावर नेण्याचे काम या बँकेने केले असून पुढे करण्याचेही काम ही बँक करीत आहे. फळ लागवड आंबा प्रक्रिया उद्योग स्वतंत्र आंबा विक्री केंद्र उभारून आज देवगडचा शेतकरी बँकांच्या अर्थ सहाय्याने उभारी घेत आहे. कर्ज घेण्याची एक मनामध्ये मानसिकता वेगळी होती. मात्र, ही मानसिकता शेतकऱ्यांची बदलून लाखो रूपयांचे कर्ज घेऊन बागायतदार उभारी घेत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रगत असल्याचे व सधन असल्याचे म्हटले जाते. याचे एकमेव कारण तेथील शेतकरी शेतीविषयक शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणून कोकणी शेतकरीही झेप घेत आहे. मात्र, कोकणी शेतकऱ्याला निसर्गाची साथ योग्य प्रमाणात मिळत नसल्याने तो थोडाफार मागे आहे. निसर्गाने कोकणी शेतकऱ्याला साथ दिली तर कोकणातील शेतकरी उत्पन्नाच्या बाबतीत देशामध्ये अग्रेसर असू शकतील, याबाबत शंका असण्याची गरज नाही. (वार्ताहर)दलालांची पिळवणूक थांबण्यास मदत होणारसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, अर्बन बँक देवगड, विविध सहकारी सेवा सोसायट्या, स्टेट बँक, युनियन बँक यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सुमारे १५ कोटीचे आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. काही वर्षापूर्वी आंबा बागायतदार हा दलालांकडून कर्ज घेऊन आंब्याची मशागत व कलम लागवड करायचे. यामुळे दलाल वर्गाकडून बागायतदारांची पिळवणूक करून आगावू कर्ज घेतल्याने आंबा पेटीमध्ये पेटीचा भाव कमी द्यायचे. ही पद्धत आजही दलालांकडून कर्ज घेतलेल्या आंबा बागायतदारांबाबत होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत.