शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

गणेशोत्सवासाठी कोकणात २२११ बसेस

By admin | Updated: August 7, 2016 22:43 IST

नियोजन सुरु : तीन जिल्ह्यात जादा गाड्यांची सोय

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी भक्तांना वेध लागलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा महिना शिल्लक राहिला आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे कोकणात २२११ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. गतवर्षी रत्नागिरी विभागात गणेशोत्सव कालावधीत १४१७, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८२, तर रायगड जिल्ह्यात २११ जादा गाड्या मुंबईहून भक्त मंडळींना घेऊन आल्या होत्या. गतवर्षी एकूण २०१३ जादा गाड्या सुटल्या होत्या. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यावर्षी गाड्यांच्या संख्येत वाढ केली असून, २२११ जादा गाड्यांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी दरवर्षी जादा गाड्यांची सुविधा करण्यात येते. ५ ते १० सप्टेंबरअखेर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. मुंबईत काम करणारी कोकणातील बहुतांश मंडळी गणेशोत्सवासाठी गावी परतते. ग्रामीण भागाची ‘जीवन वाहिनी’ ठरलेली एस. टी. वाडीवस्तीवर पोहोचली आहे. रेल्वे ग्रामीण भागातील सर्वांनाच शक्य नसल्यामुळे एस. टी.चा प्रवास सोयीस्कर ठरत आहे. गणेशोत्सवासाठी एस. टी.च्या जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखाद्या गावातील मंडळींनी ४४ सीटचे आरक्षण केल्यास त्यांना त्यांच्या गावासाठी खास बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोकण रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असली तरी एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले असताना एस. टी.ने मात्र सुरळीत, सुरक्षित प्रवासी वाहतूक सुरू असते. सन २०१३मध्ये रत्नागिरी विभागाने १३१७ जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न लाभले होते. २०१४मध्ये १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे दोन कोटी १० लाख ६९ हजारांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी १४१७ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे एक कोटी ७१ लाख ३२ हजारांचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षी मागील दोन वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात चांगलीच घट झाली होती. तरीही यावर्षी महामंडळाने गणपती सणासाठी गाड्यांचे नियोजन केले आहे. गौरी - गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांच्या परतीसाठी रत्नागिरी विभागातून १० सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित १५० गाड्या दररोज मुंबई मार्गावर धावणार आहेत. गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता जादा गाड्यांसमवेत चेकपोस्ट गस्तीपथके तैनात करण्यात येणार आहेत. सकाळी १० ते १२.३० तसेच १२.३० ते ६ यावेळेत गस्तीपथके महामार्गावर कार्यरत राहून जादा गाड्यांची तपासणी करणार आहेत. कशेडी येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. याशिवाय तात्पुरते वाहनतळ व दुरुस्ती पथकांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक आगारामध्ये चौकशी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या मुंबईकरांची चांगली सोय होणार आहे.