शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

रत्नागिरी-सिंधुदुर्गलाच हवेत २00 कोटी

By admin | Updated: June 23, 2016 01:21 IST

आशा पल्लवीत : आता प्रतीक्षा जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासन पूर्ततेची

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पांची संख्या ५०पेक्षा अधिक आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०० कोटींपेक्षा अधिक निधीची आवश्यकता आहे. कोकणातील अपूर्णावस्थेत असलेल्या जलसिंचन प्रकल्पांसाठी ४०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे. त्यातील ५० टक्के निधी हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनाच द्यावा लागणार आहे. अन्य अपूर्ण प्रकल्प पाहता या दोन्ही जिल्ह्यांच्या वाट्याला किती निधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांची मुख्य कार्यालये रत्नागिरी येथे आहेत. याठिकाणी असलेल्या लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ लघुसिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्प कामांसाठी आत्तापर्यंत २३८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित कामांसाठी १७६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विभागांतर्गत पेंडूर, नानिवडे महाजनवाडी व किर्लोस हे तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर १४ प्रकल्प हे अपूर्ण अवस्थेत आहेत. प्रकल्पांसाठी आत्तापर्यंत १५४ कोटी रुपये खर्च झाले असून, आणखी २३.७३ कोटी रुपये एवढ्या मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या विभागांतर्गत येणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३५ प्रकल्प याआधीच रद्द करण्यात आले आहेत.रत्नागिरीत ३६ प्रकल्प अपूर्णजिल्ह्यात अपूर्ण असलेल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये सुकोंडी-वाघिवणे, राजेवाडी, जुवाठी, तळवली, इंदवटी, कुवे, चिंचाळी, मोर्डे, परुळे, हर्दखळे, तिवरे, वाटूळ, ताडील, वाळवट मूर, शिंदेआंबेरी, खडी ओझर, सोनारवाडी, कोंडवली, रेवली, कासई कावळे, जामगे-विसापूर, वावे, खानू, जड्यारवाडी, पानवल, कादिवली, कोंडगे, आरगाव, शिवणे, कुरवळ, फुरुस चव्हाणवाडी, मुसाड, कोसबी, कुडुक खुर्द, फुरुस कदमवाडी, कुरंग यांचा समावेश आहे. तर पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये तुळशी, शिलडी, गोपाळवाडी, करोळी, जामगे भोवरा, तांबेडी या लघुसिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. सिंधुदुर्गात १४ प्रकल्प अपूर्णसिंधुदुर्ग जिल्ह्यात लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत १४ जलसिंचन प्रकल्पांची कामे अपूर्ण आहेत. त्यामध्ये जानवली, विलवडे, कोकिसरे, सावडाव, शिरवळ, वागदे, आंब्रड, वर्दे, नानिवडे, करूळ-जामदारवाडी, डोना, ओवळीये, कुंभवडे, ऐनारी या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम रेंगाळल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विभागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या प्रकल्पांमुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी शासनकर्त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.अर्जुना, मुचकुंदी, चिंचवाडीचे कालवे अजून अपूर्णपाटबंधारे बांधकाम विभाग, रत्नागिरी अंतर्गत येणाऱ्या अर्जुना, चिंचवाडी व मुचकुंंदी प्रकल्पांची धरणे पूर्ण झाली आहेत. या तीनही धरणांच्या प्रत्येकी दोन कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यासाठीही काही कोटी निधीची आवश्यकता आहे. ही अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार? असा सवाल होत आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडील १ मध्यम, २३ लघु व कोकण पध्दतीचे ५ बंधारे मिळून २८ प्रकल्पांची कामे पूर्ण आहेत. या विभागाकडील कोणताही धरणप्रकल्प सध्या अपूर्ण नाही. ४०० कोटींचे आश्वासन पूर्ण होणार?कोकणातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले आहे. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक उपस्थित होते. मंत्र्यांनी तर आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता किती प्रमाणात होणार, जलसिंचन प्रकल्पांना नक्की किधी निधी मिळणार, हे येत्या पावसाळी अधिवेशनातच स्पष्ट होणार आहे.