शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गलाच हवेत २00 कोटी

By admin | Updated: June 23, 2016 01:21 IST

आशा पल्लवीत : आता प्रतीक्षा जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासन पूर्ततेची

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पांची संख्या ५०पेक्षा अधिक आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०० कोटींपेक्षा अधिक निधीची आवश्यकता आहे. कोकणातील अपूर्णावस्थेत असलेल्या जलसिंचन प्रकल्पांसाठी ४०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे. त्यातील ५० टक्के निधी हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनाच द्यावा लागणार आहे. अन्य अपूर्ण प्रकल्प पाहता या दोन्ही जिल्ह्यांच्या वाट्याला किती निधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांची मुख्य कार्यालये रत्नागिरी येथे आहेत. याठिकाणी असलेल्या लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ लघुसिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्प कामांसाठी आत्तापर्यंत २३८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित कामांसाठी १७६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विभागांतर्गत पेंडूर, नानिवडे महाजनवाडी व किर्लोस हे तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर १४ प्रकल्प हे अपूर्ण अवस्थेत आहेत. प्रकल्पांसाठी आत्तापर्यंत १५४ कोटी रुपये खर्च झाले असून, आणखी २३.७३ कोटी रुपये एवढ्या मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या विभागांतर्गत येणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३५ प्रकल्प याआधीच रद्द करण्यात आले आहेत.रत्नागिरीत ३६ प्रकल्प अपूर्णजिल्ह्यात अपूर्ण असलेल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये सुकोंडी-वाघिवणे, राजेवाडी, जुवाठी, तळवली, इंदवटी, कुवे, चिंचाळी, मोर्डे, परुळे, हर्दखळे, तिवरे, वाटूळ, ताडील, वाळवट मूर, शिंदेआंबेरी, खडी ओझर, सोनारवाडी, कोंडवली, रेवली, कासई कावळे, जामगे-विसापूर, वावे, खानू, जड्यारवाडी, पानवल, कादिवली, कोंडगे, आरगाव, शिवणे, कुरवळ, फुरुस चव्हाणवाडी, मुसाड, कोसबी, कुडुक खुर्द, फुरुस कदमवाडी, कुरंग यांचा समावेश आहे. तर पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये तुळशी, शिलडी, गोपाळवाडी, करोळी, जामगे भोवरा, तांबेडी या लघुसिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. सिंधुदुर्गात १४ प्रकल्प अपूर्णसिंधुदुर्ग जिल्ह्यात लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत १४ जलसिंचन प्रकल्पांची कामे अपूर्ण आहेत. त्यामध्ये जानवली, विलवडे, कोकिसरे, सावडाव, शिरवळ, वागदे, आंब्रड, वर्दे, नानिवडे, करूळ-जामदारवाडी, डोना, ओवळीये, कुंभवडे, ऐनारी या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम रेंगाळल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विभागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या प्रकल्पांमुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी शासनकर्त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.अर्जुना, मुचकुंदी, चिंचवाडीचे कालवे अजून अपूर्णपाटबंधारे बांधकाम विभाग, रत्नागिरी अंतर्गत येणाऱ्या अर्जुना, चिंचवाडी व मुचकुंंदी प्रकल्पांची धरणे पूर्ण झाली आहेत. या तीनही धरणांच्या प्रत्येकी दोन कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यासाठीही काही कोटी निधीची आवश्यकता आहे. ही अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार? असा सवाल होत आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडील १ मध्यम, २३ लघु व कोकण पध्दतीचे ५ बंधारे मिळून २८ प्रकल्पांची कामे पूर्ण आहेत. या विभागाकडील कोणताही धरणप्रकल्प सध्या अपूर्ण नाही. ४०० कोटींचे आश्वासन पूर्ण होणार?कोकणातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले आहे. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक उपस्थित होते. मंत्र्यांनी तर आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता किती प्रमाणात होणार, जलसिंचन प्रकल्पांना नक्की किधी निधी मिळणार, हे येत्या पावसाळी अधिवेशनातच स्पष्ट होणार आहे.