शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

रत्नागिरी-सिंधुदुर्गलाच हवेत २00 कोटी

By admin | Updated: June 23, 2016 01:21 IST

आशा पल्लवीत : आता प्रतीक्षा जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासन पूर्ततेची

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पांची संख्या ५०पेक्षा अधिक आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०० कोटींपेक्षा अधिक निधीची आवश्यकता आहे. कोकणातील अपूर्णावस्थेत असलेल्या जलसिंचन प्रकल्पांसाठी ४०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे. त्यातील ५० टक्के निधी हा रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनाच द्यावा लागणार आहे. अन्य अपूर्ण प्रकल्प पाहता या दोन्ही जिल्ह्यांच्या वाट्याला किती निधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांची मुख्य कार्यालये रत्नागिरी येथे आहेत. याठिकाणी असलेल्या लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ लघुसिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्प कामांसाठी आत्तापर्यंत २३८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित कामांसाठी १७६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विभागांतर्गत पेंडूर, नानिवडे महाजनवाडी व किर्लोस हे तीन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर १४ प्रकल्प हे अपूर्ण अवस्थेत आहेत. प्रकल्पांसाठी आत्तापर्यंत १५४ कोटी रुपये खर्च झाले असून, आणखी २३.७३ कोटी रुपये एवढ्या मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या विभागांतर्गत येणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३५ प्रकल्प याआधीच रद्द करण्यात आले आहेत.रत्नागिरीत ३६ प्रकल्प अपूर्णजिल्ह्यात अपूर्ण असलेल्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये सुकोंडी-वाघिवणे, राजेवाडी, जुवाठी, तळवली, इंदवटी, कुवे, चिंचाळी, मोर्डे, परुळे, हर्दखळे, तिवरे, वाटूळ, ताडील, वाळवट मूर, शिंदेआंबेरी, खडी ओझर, सोनारवाडी, कोंडवली, रेवली, कासई कावळे, जामगे-विसापूर, वावे, खानू, जड्यारवाडी, पानवल, कादिवली, कोंडगे, आरगाव, शिवणे, कुरवळ, फुरुस चव्हाणवाडी, मुसाड, कोसबी, कुडुक खुर्द, फुरुस कदमवाडी, कुरंग यांचा समावेश आहे. तर पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये तुळशी, शिलडी, गोपाळवाडी, करोळी, जामगे भोवरा, तांबेडी या लघुसिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. सिंधुदुर्गात १४ प्रकल्प अपूर्णसिंधुदुर्ग जिल्ह्यात लघुसिंचन जलसंधारण विभागांतर्गत १४ जलसिंचन प्रकल्पांची कामे अपूर्ण आहेत. त्यामध्ये जानवली, विलवडे, कोकिसरे, सावडाव, शिरवळ, वागदे, आंब्रड, वर्दे, नानिवडे, करूळ-जामदारवाडी, डोना, ओवळीये, कुंभवडे, ऐनारी या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम रेंगाळल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विभागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच या प्रकल्पांमुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी शासनकर्त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.अर्जुना, मुचकुंदी, चिंचवाडीचे कालवे अजून अपूर्णपाटबंधारे बांधकाम विभाग, रत्नागिरी अंतर्गत येणाऱ्या अर्जुना, चिंचवाडी व मुचकुंंदी प्रकल्पांची धरणे पूर्ण झाली आहेत. या तीनही धरणांच्या प्रत्येकी दोन कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यासाठीही काही कोटी निधीची आवश्यकता आहे. ही अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार? असा सवाल होत आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडील १ मध्यम, २३ लघु व कोकण पध्दतीचे ५ बंधारे मिळून २८ प्रकल्पांची कामे पूर्ण आहेत. या विभागाकडील कोणताही धरणप्रकल्प सध्या अपूर्ण नाही. ४०० कोटींचे आश्वासन पूर्ण होणार?कोकणातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले आहे. त्यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक उपस्थित होते. मंत्र्यांनी तर आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता किती प्रमाणात होणार, जलसिंचन प्रकल्पांना नक्की किधी निधी मिळणार, हे येत्या पावसाळी अधिवेशनातच स्पष्ट होणार आहे.