शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

कोकण विभागाचा २० टक्के निकाल

By admin | Updated: November 18, 2015 00:07 IST

बारावी परीक्षा : आॅनलाईन निकाल जाहीर

रत्नागिरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळातर्फे आॅक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे. कोकण विभागीय मंडळाचा एकूण निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळातर्फे एकूण ९ विभागीय मंडळातून ७८ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, त्यापैकी ७६ हजार २७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १६ हजार ४६४ विद्यार्थी पास झाल्याने एकूण निकाल २१.५९ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कोकण विभागीय मंडळातून ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. पैकी ६९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४० विद्यार्थी पास झाले असून, निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.कोकण परीक्षा मंडळातून ५२२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. पैकी ५०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ९८ विद्यार्थी पास झाले. एकूण निकाल १९.४१ टक्के इतका लागला आहे, तर १९५ मुलींनी अर्ज भरले होेते. त्यापैकी १८८ मुली परीक्षेला बसल्या होत्या. ४२ विद्यार्थिनी पास झाल्याने २२.३४ टक्के निकाल लागला आहे. त्यामुळे मुलींनी आपला झेंडा राखला आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी शाखांपैकी सर्वाधिक निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लाभला आहे. या विभागातून ५ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ५ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६१ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल ३६.२५ टक्के इतका लागला आहे. त्यापाठोपाठ निकाल लातूर विभागाचा लागला आहे. या विभागातून ३८२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ३ हजार ७३६ परीक्षेला बसले होते, त्यातील १ हजार ९० विद्यार्थी पास झाले आहेत. निकालामध्ये तृतीय क्रमांक नागपूर विभागाचा लागला आहे. ८ हजार २५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ५ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६१ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल २३. ८२ टक्के लागला आहे.सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. २१ हजार २६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, पैकी २० हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ३ हजार ७३५ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल १७.९२ टक्के इतका लागला आहे. नऊ विभागातून मुंबई विभागाचा निकाल घसरला आहे. कोकण व कोल्हापूर विभागाचा निकाल मात्र सारखा आहे. कोल्हापूर विभागातून ७ हजार ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते, पैकी ६ हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १३८६ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.परीक्षार्थींना गुणपत्रिकेचे वितरण दि. २० रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)