शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण विभागाचा २० टक्के निकाल

By admin | Updated: November 18, 2015 00:07 IST

बारावी परीक्षा : आॅनलाईन निकाल जाहीर

रत्नागिरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळातर्फे आॅक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे. कोकण विभागीय मंडळाचा एकूण निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळातर्फे एकूण ९ विभागीय मंडळातून ७८ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, त्यापैकी ७६ हजार २७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १६ हजार ४६४ विद्यार्थी पास झाल्याने एकूण निकाल २१.५९ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कोकण विभागीय मंडळातून ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. पैकी ६९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४० विद्यार्थी पास झाले असून, निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.कोकण परीक्षा मंडळातून ५२२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. पैकी ५०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ९८ विद्यार्थी पास झाले. एकूण निकाल १९.४१ टक्के इतका लागला आहे, तर १९५ मुलींनी अर्ज भरले होेते. त्यापैकी १८८ मुली परीक्षेला बसल्या होत्या. ४२ विद्यार्थिनी पास झाल्याने २२.३४ टक्के निकाल लागला आहे. त्यामुळे मुलींनी आपला झेंडा राखला आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी शाखांपैकी सर्वाधिक निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लाभला आहे. या विभागातून ५ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ५ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६१ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल ३६.२५ टक्के इतका लागला आहे. त्यापाठोपाठ निकाल लातूर विभागाचा लागला आहे. या विभागातून ३८२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ३ हजार ७३६ परीक्षेला बसले होते, त्यातील १ हजार ९० विद्यार्थी पास झाले आहेत. निकालामध्ये तृतीय क्रमांक नागपूर विभागाचा लागला आहे. ८ हजार २५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ५ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६१ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल २३. ८२ टक्के लागला आहे.सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. २१ हजार २६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, पैकी २० हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ३ हजार ७३५ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल १७.९२ टक्के इतका लागला आहे. नऊ विभागातून मुंबई विभागाचा निकाल घसरला आहे. कोकण व कोल्हापूर विभागाचा निकाल मात्र सारखा आहे. कोल्हापूर विभागातून ७ हजार ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते, पैकी ६ हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १३८६ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.परीक्षार्थींना गुणपत्रिकेचे वितरण दि. २० रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)