शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

कोकण विभागाचा २० टक्के निकाल

By admin | Updated: November 18, 2015 00:07 IST

बारावी परीक्षा : आॅनलाईन निकाल जाहीर

रत्नागिरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळातर्फे आॅक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे. कोकण विभागीय मंडळाचा एकूण निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळातर्फे एकूण ९ विभागीय मंडळातून ७८ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, त्यापैकी ७६ हजार २७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १६ हजार ४६४ विद्यार्थी पास झाल्याने एकूण निकाल २१.५९ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कोकण विभागीय मंडळातून ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. पैकी ६९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४० विद्यार्थी पास झाले असून, निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.कोकण परीक्षा मंडळातून ५२२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. पैकी ५०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ९८ विद्यार्थी पास झाले. एकूण निकाल १९.४१ टक्के इतका लागला आहे, तर १९५ मुलींनी अर्ज भरले होेते. त्यापैकी १८८ मुली परीक्षेला बसल्या होत्या. ४२ विद्यार्थिनी पास झाल्याने २२.३४ टक्के निकाल लागला आहे. त्यामुळे मुलींनी आपला झेंडा राखला आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी शाखांपैकी सर्वाधिक निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लाभला आहे. या विभागातून ५ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ५ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६१ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल ३६.२५ टक्के इतका लागला आहे. त्यापाठोपाठ निकाल लातूर विभागाचा लागला आहे. या विभागातून ३८२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ३ हजार ७३६ परीक्षेला बसले होते, त्यातील १ हजार ९० विद्यार्थी पास झाले आहेत. निकालामध्ये तृतीय क्रमांक नागपूर विभागाचा लागला आहे. ८ हजार २५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ५ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६१ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल २३. ८२ टक्के लागला आहे.सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. २१ हजार २६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, पैकी २० हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ३ हजार ७३५ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल १७.९२ टक्के इतका लागला आहे. नऊ विभागातून मुंबई विभागाचा निकाल घसरला आहे. कोकण व कोल्हापूर विभागाचा निकाल मात्र सारखा आहे. कोल्हापूर विभागातून ७ हजार ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते, पैकी ६ हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १३८६ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.परीक्षार्थींना गुणपत्रिकेचे वितरण दि. २० रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)