शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

साकव दुरूस्तीसाठी १५ कोटी मंजूर

By admin | Updated: March 25, 2017 21:46 IST

पालकमंत्र्यांचे प्रयत्न : ५० लाखांपर्यंतच्या पुलांचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील साकव तसेच पुलांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत दोनवेळा पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ४०२ साकव तसेच २९ पुलांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. यात साकव दुरुस्तीसाठी तब्बल १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ५० लाखांपर्यंतचे पुलांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये मंजूर होऊनही या कामाला सुरूवात झाली नव्हती. तसेच सावित्री पूल दुर्घटनेनंतर पालकमंत्री वायकर यांनी जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार याचा आढावा घेण्यासाठी वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील त्यांच्या दालनात सलग दोनवेळा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीला प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, रस्ते विभागाचे सचिव सी. पी जोशी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेने दुरुस्ती सुचवलेल्या साकवांपैकी ४०२ साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यात उत्तर रत्नागिरीतील एकूण २०७ साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८ कोटी रुपये तर सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण अंतर्गत येणाऱ्या १९५ साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ६ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. साकव दुरुस्तीची कामे सद्यस्थितीत निविदास्तरावर आहेत. यात ३ लाखांपर्यंतच्या साकव दुरुस्तीचे टेंडर काढण्यात आले आहे. जिल्ह्यातील कमकुवत झालेल्या पुलांच्या दुरुस्तीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण २९ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक अभियंता बोबडे यांनी दिली. यात सार्वजनिक बांधकाम विभाग (चिपळूण) अंतर्गत येणाऱ्या एकूण १३ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, यासाठी १ कोटी ४५ लाख रुपये इतका तर तर सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर रत्नागिरी) अंतर्गत येणाऱ्या एकूण १६ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, यासाठी २ कोटी ११ लाख रुपयांची आवश्यकता आहे. ज्या पुलांच्या दुरुस्तीचा खर्च ५० लाखांपर्यंत आहे, अशा पुलांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)दुरूस्ती आवश्यकजिल्ह्यातील ग्रामीण भागात साकवांची स्थिती अतिशय बिकट आहे. या साकवांवरून जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे साकवांची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २९ पुलांपैकी ५० लाखांपर्यंतच्या पुलांच्या दुरुस्ती कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे.चार साकव अतिधोकादायकगुहागर तालुका : ८५ पैकी ७२ साकव दुरूस्तीच्या प्रतीक्षेतलांजात ८७ लोखंडी साकव धोकादायकजिल्हा प्रशासन जागे : तालुक्यातील ६३ गावांमध्ये १३१ लोखंडी, आरसीसी साकव; डागडुजी होणे गरजेचे.खेडमधील साकवांची दुरूस्ती २ वर्षे रखडलीसंगमेश्वरातील प्रस्तावांना धुळीची डागडुजीनिधीअभावी दुरूस्ती रखडलीचिपळूण तालुका : १५६ पैकी १११ साकवांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव९१ साकवांची पडझड