शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

साकव दुरूस्तीसाठी १५ कोटी मंजूर

By admin | Updated: March 25, 2017 21:46 IST

पालकमंत्र्यांचे प्रयत्न : ५० लाखांपर्यंतच्या पुलांचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील साकव तसेच पुलांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत दोनवेळा पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ४०२ साकव तसेच २९ पुलांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. यात साकव दुरुस्तीसाठी तब्बल १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ५० लाखांपर्यंतचे पुलांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये मंजूर होऊनही या कामाला सुरूवात झाली नव्हती. तसेच सावित्री पूल दुर्घटनेनंतर पालकमंत्री वायकर यांनी जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार याचा आढावा घेण्यासाठी वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील त्यांच्या दालनात सलग दोनवेळा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीला प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, रस्ते विभागाचे सचिव सी. पी जोशी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेने दुरुस्ती सुचवलेल्या साकवांपैकी ४०२ साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यात उत्तर रत्नागिरीतील एकूण २०७ साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८ कोटी रुपये तर सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण अंतर्गत येणाऱ्या १९५ साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ६ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. साकव दुरुस्तीची कामे सद्यस्थितीत निविदास्तरावर आहेत. यात ३ लाखांपर्यंतच्या साकव दुरुस्तीचे टेंडर काढण्यात आले आहे. जिल्ह्यातील कमकुवत झालेल्या पुलांच्या दुरुस्तीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण २९ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक अभियंता बोबडे यांनी दिली. यात सार्वजनिक बांधकाम विभाग (चिपळूण) अंतर्गत येणाऱ्या एकूण १३ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, यासाठी १ कोटी ४५ लाख रुपये इतका तर तर सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर रत्नागिरी) अंतर्गत येणाऱ्या एकूण १६ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, यासाठी २ कोटी ११ लाख रुपयांची आवश्यकता आहे. ज्या पुलांच्या दुरुस्तीचा खर्च ५० लाखांपर्यंत आहे, अशा पुलांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)दुरूस्ती आवश्यकजिल्ह्यातील ग्रामीण भागात साकवांची स्थिती अतिशय बिकट आहे. या साकवांवरून जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे साकवांची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २९ पुलांपैकी ५० लाखांपर्यंतच्या पुलांच्या दुरुस्ती कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे.चार साकव अतिधोकादायकगुहागर तालुका : ८५ पैकी ७२ साकव दुरूस्तीच्या प्रतीक्षेतलांजात ८७ लोखंडी साकव धोकादायकजिल्हा प्रशासन जागे : तालुक्यातील ६३ गावांमध्ये १३१ लोखंडी, आरसीसी साकव; डागडुजी होणे गरजेचे.खेडमधील साकवांची दुरूस्ती २ वर्षे रखडलीसंगमेश्वरातील प्रस्तावांना धुळीची डागडुजीनिधीअभावी दुरूस्ती रखडलीचिपळूण तालुका : १५६ पैकी १११ साकवांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव९१ साकवांची पडझड