शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साकव दुरूस्तीसाठी १५ कोटी मंजूर

By admin | Updated: March 25, 2017 21:46 IST

पालकमंत्र्यांचे प्रयत्न : ५० लाखांपर्यंतच्या पुलांचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील साकव तसेच पुलांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत दोनवेळा पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ४०२ साकव तसेच २९ पुलांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. यात साकव दुरुस्तीसाठी तब्बल १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ५० लाखांपर्यंतचे पुलांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यासही या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये मंजूर होऊनही या कामाला सुरूवात झाली नव्हती. तसेच सावित्री पूल दुर्घटनेनंतर पालकमंत्री वायकर यांनी जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार याचा आढावा घेण्यासाठी वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील त्यांच्या दालनात सलग दोनवेळा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीला प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, रस्ते विभागाचे सचिव सी. पी जोशी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेने दुरुस्ती सुचवलेल्या साकवांपैकी ४०२ साकवांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यात उत्तर रत्नागिरीतील एकूण २०७ साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८ कोटी रुपये तर सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण अंतर्गत येणाऱ्या १९५ साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ६ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. साकव दुरुस्तीची कामे सद्यस्थितीत निविदास्तरावर आहेत. यात ३ लाखांपर्यंतच्या साकव दुरुस्तीचे टेंडर काढण्यात आले आहे. जिल्ह्यातील कमकुवत झालेल्या पुलांच्या दुरुस्तीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण २९ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक अभियंता बोबडे यांनी दिली. यात सार्वजनिक बांधकाम विभाग (चिपळूण) अंतर्गत येणाऱ्या एकूण १३ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, यासाठी १ कोटी ४५ लाख रुपये इतका तर तर सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर रत्नागिरी) अंतर्गत येणाऱ्या एकूण १६ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, यासाठी २ कोटी ११ लाख रुपयांची आवश्यकता आहे. ज्या पुलांच्या दुरुस्तीचा खर्च ५० लाखांपर्यंत आहे, अशा पुलांच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)दुरूस्ती आवश्यकजिल्ह्यातील ग्रामीण भागात साकवांची स्थिती अतिशय बिकट आहे. या साकवांवरून जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे साकवांची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २९ पुलांपैकी ५० लाखांपर्यंतच्या पुलांच्या दुरुस्ती कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे.चार साकव अतिधोकादायकगुहागर तालुका : ८५ पैकी ७२ साकव दुरूस्तीच्या प्रतीक्षेतलांजात ८७ लोखंडी साकव धोकादायकजिल्हा प्रशासन जागे : तालुक्यातील ६३ गावांमध्ये १३१ लोखंडी, आरसीसी साकव; डागडुजी होणे गरजेचे.खेडमधील साकवांची दुरूस्ती २ वर्षे रखडलीसंगमेश्वरातील प्रस्तावांना धुळीची डागडुजीनिधीअभावी दुरूस्ती रखडलीचिपळूण तालुका : १५६ पैकी १११ साकवांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव९१ साकवांची पडझड