शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पोलिसांसाठी १४० कोटींचे गृहसंकुल

By admin | Updated: March 27, 2017 23:42 IST

उदय सामंत यांची माहिती; रत्नागिरीतील ५२0 पोलिसांना मिळणार छत

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पोलिस मुख्यालयाजवळ जुन्या पोलिस वसाहतीच्या जागेत पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी १४० कोटी रुपये खर्चाचे पोलिस गृहसंकुल उभारले जाणार आहे. यात ५२० सदनिका बांधल्या जाणार आहेत. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया येत्या चार महिन्यांत होईल. त्यानंतर ३ वर्षात या संकुलाची उभारणी पूर्ण होईल. विधानसभा अंदाज समितीच्या माध्यमातून हे काम मार्गी लागत असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम दिलेल्या मिटकॉन कंपनीचे अधिकारी प्रमोद पवार यावेळी उपस्थित होते. सामंत म्हणाले, रत्नागिरीतील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांची सध्या असलेली निवास व्यवस्था ही जुन्या पोलिस वसाहतीत आहे. मात्र, तेथे पोलिसांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळेच पोलिसांसाठी ५२० सदनिकांचे गृहसंकुल तसेच अधिकाऱ्यांसाठी बंगले, पोलिसांसाठी सुसज्ज व्यायामशाळा, वाचनालय, श्री महापुरुष मंदिराचे सुशोभीकरण, सभागृह, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह यांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या गृहसंकुलाचा आराखडा बनविण्याचे काम मिटकॉन कंपनीला देण्यात आले आहे. त्याबाबत सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. यावेळी आमदार सामंत यांच्यासोबत नगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेवक किशोर मोरे, बिपीन बंदरकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्मितल पावसकर, मिटकॉन कंपनीचे अधिकारी प्रमोद पवार व सहकारी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यालयाजवळील पोलिस वसाहतीची पाहणी करण्यात आली. (प्रतिनिधी)