शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आगामी वर्षात १३०० कोटींचा निधी मिळणार

By admin | Updated: November 25, 2015 23:27 IST

दीपक केसरकर : वर्षपूर्तीनिमित्त विकास पुस्तिका प्रसिद्ध

सावंतवाडी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गावातील रस्त्यांसाठी १३०० कोटी रूपयांचा निधी जिल्ह्याला मिळणार असून, जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या विकास व वाढीसाठी नवीन रस्ते गावागावात तयार होणार आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांवर होत असलेली पोलिसांची अरेरावीवर नियंत्रण आणण्यसाठी तत्काळ लक्ष देण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंंदे यांना दिले. ‘सिंधुदुर्ग जिल्हा एक पाऊल वचनपूर्तीचे’ हा वार्तालाप कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यक्रमांतर्गत येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, माजी आमदार पुष्पसेन सावंत, तहसीलदार सतीश कदम आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारला एक वर्ष पूर्ण होत आले. शासनाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा यावेळी आढावा घेतला. यावेळी पर्यटन विकासवाढीबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याबाबत पालकमंत्री केसरकर यांनी आंबोली घाटात तीन-चार ठिकाणी होणाऱ्या तपासण्या रद्द करून एकाच ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश दिले. तर एकाचवेळी तपासणी झाल्यावर त्यांना तपासणी पावती देण्याबाबत प्रयत्न करणार आहे. यामुळे तीन तपासणी पावती अन्य तपासणी नाक्यांवर दाखविल्यास अनेकवेळा तपासणी करण्याची गरज भासणार नाही, असे केसरकर म्हणाले. यामध्ये सुधारणा झाली नाही तर राज्यपातळीवर तक्रार करणार असल्याचे केसरकर म्हणाले. येथील उपजिल्हा रूग्णालयातही डायलेसीस सेंटरच्या अपुऱ्या सुविधांमुळे जिल्हा रूग्णालयात असणारी स्वेअर मशिन सावंतवाडीत आणण्यात येणार आहे. राजीव गांधी योजनेंतर्गत मणिपाल हॉस्पिटल, केर्इंली बेळगाव व गोवा येथील मेडिकल हॉस्पिटल आदी सर्व रूग्णालयांमध्ये नोंदणी लवकरच करण्यात येणार असल्याचे यावेळी केसरकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोेटीच्यांवर निधी आल्याचे केसरकर यांनी सांगितले. तसेच ग्रामविकासच्या माध्यमातून येणाऱ्या कोट्यवधींच्या निधीची माहिती दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)