शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

शंभर कोटी वृक्षलागवड संकल्प

By admin | Updated: August 6, 2015 22:01 IST

पावसाची अनियमितता वाढली : शासनाचा महसूल, वनविभागाचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : अवैध वृक्षतोडीमुळे पावसाची अनियमितता वाढली आहे. त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाच्या महसूल व वनविभागांनी सन २०१५-१६ ते सन २०१७-१८ या तीन वर्षांत राज्यामध्ये १०० कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.जागतिक तापमानातील वाढ आणि हवामानातील बदल याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू झाले आहे. महाराष्ट्रात वृक्षाच्छादन भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्क््यांच्या जवळपास आहे. पर्यावरण संतुलन आणि समतोल राखणे आणि टिकविण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी ३३ टक्क््यांपर्यंत असणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये वृक्षलागवड करून त्यातून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील वृक्ष लागवड आणि उत्पादनाची निर्मिती करून जैवविविधतेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ३० जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत येत्या तीन वर्षांसाठी सन २०१५ -१६ ते २०१७-१८ या दरम्यान राज्यामध्ये १०० कोटी वृक्षलागवड होणार आहे. यासाठी नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय एक समिती स्थापन करण्यात आली आहे. हा अहवाल ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत शासनास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.वृक्षांचे संरक्षण, पाणीपुरवठा, देखभाल, जोपासना आणि संगोपन, आदी कामांचे सनियंत्रण, आढावा व देखरेख करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, शहर व त्यानंतर गाव स्तरावरील समित्या त्यांची रचना याची अंमलबजावणी समिती करणार आहे. (प्रतिनिधी)अशा कराव्या लागणार उपाययोजनाजिवंत रोपांची टक्केवारी ८० ते ९० टक्क्यांपर्यंत राहण्यासाठी आवश्यक संरक्षण विषयक उपाययोजना करणे.स्थानिक जिल्हा, तालुका व ग्राम पातळीवरील भौगोलिक परिस्थितीनुसार लागवडीसाठी वृक्ष प्रजातींची निवड करणे.वृक्षारोपणाच्या नियोजनात सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, कृषी, जलसंधारण, शिक्षण, आदिवासी, ग्रामविकास, उद्योग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आदी विभागांना सामावून घेण्यात येणार आहे.वृक्षारोपणासाठी वन, खासगी व सार्वजनिक पडीक जमिनींचा वापर करण्यात येणार आहे.