शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शंभर कोटी वृक्षलागवड संकल्प

By admin | Updated: August 6, 2015 22:01 IST

पावसाची अनियमितता वाढली : शासनाचा महसूल, वनविभागाचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : अवैध वृक्षतोडीमुळे पावसाची अनियमितता वाढली आहे. त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाच्या महसूल व वनविभागांनी सन २०१५-१६ ते सन २०१७-१८ या तीन वर्षांत राज्यामध्ये १०० कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.जागतिक तापमानातील वाढ आणि हवामानातील बदल याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू झाले आहे. महाराष्ट्रात वृक्षाच्छादन भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्क््यांच्या जवळपास आहे. पर्यावरण संतुलन आणि समतोल राखणे आणि टिकविण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी ३३ टक्क््यांपर्यंत असणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये वृक्षलागवड करून त्यातून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील वृक्ष लागवड आणि उत्पादनाची निर्मिती करून जैवविविधतेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ३० जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत येत्या तीन वर्षांसाठी सन २०१५ -१६ ते २०१७-१८ या दरम्यान राज्यामध्ये १०० कोटी वृक्षलागवड होणार आहे. यासाठी नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय एक समिती स्थापन करण्यात आली आहे. हा अहवाल ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत शासनास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.वृक्षांचे संरक्षण, पाणीपुरवठा, देखभाल, जोपासना आणि संगोपन, आदी कामांचे सनियंत्रण, आढावा व देखरेख करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, शहर व त्यानंतर गाव स्तरावरील समित्या त्यांची रचना याची अंमलबजावणी समिती करणार आहे. (प्रतिनिधी)अशा कराव्या लागणार उपाययोजनाजिवंत रोपांची टक्केवारी ८० ते ९० टक्क्यांपर्यंत राहण्यासाठी आवश्यक संरक्षण विषयक उपाययोजना करणे.स्थानिक जिल्हा, तालुका व ग्राम पातळीवरील भौगोलिक परिस्थितीनुसार लागवडीसाठी वृक्ष प्रजातींची निवड करणे.वृक्षारोपणाच्या नियोजनात सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, कृषी, जलसंधारण, शिक्षण, आदिवासी, ग्रामविकास, उद्योग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आदी विभागांना सामावून घेण्यात येणार आहे.वृक्षारोपणासाठी वन, खासगी व सार्वजनिक पडीक जमिनींचा वापर करण्यात येणार आहे.