शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘आरोग्या’चा १ कोटी निधी परत जाणार

By admin | Updated: March 26, 2015 00:10 IST

आरोग्य समिती सभा : उपकेंद्र उभारणीसाठी जागा शोधण्यास अपयश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे तब्बल १ कोटी २६ लाख रूपये एवढा निधी शासनास परत करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभेत उघड झाली. उपकेंद्र उभारणीसाठी जागा शोधण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरण्याचा फटका निधीला बसला आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिकामे वर्ग, परिसरातील जागांवर उपकेंद्र सुरू करण्याविषयी जागा उपलब्धता अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी दिले. याबाबत समिती सदस्य संग्राम प्रभूगावकर यांनी सूचना मांडली. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, संग्राम प्रभूदेसाई, निकिता जाधव, नम्रता हरदास, समिती सचिव डॉ. अनिरूद्ध आठले, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्गातील आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी लाखो रूपये यावर खर्च झाले. सन २०१३-१४ चा अखर्चित निधी सन २०१४-१५ वर्षात खर्च करणे बंधनकारक होते. मात्र, तसे न झाल्याने तब्बल सव्वा कोटी रूपये निधी शासनास परत करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ५ डॉक्टर केवळ हजर होऊन कुणालाही न सांगता माघारी निघून गेले. तर ७ अधिकारी पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेत आहेत. तर २० ठिकाणी अधिकारीच नाहीत. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्याला रिक्त डॉक्टरांची पदे भरली जातील, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? रिक्त पदांवर डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत सध्या कार्यरत असणाऱ्या १७ डॉक्टरांना मुदतवाढ देण्याचा ठराव घ्यावा.- संग्राम प्रभूगावकर,जिल्हा परिषद सदस्यआशांना मिळणार ‘दिवाळी’ भेटमानधन तत्त्वावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त २ हजार रूपये दिवाळी भेट मिळावी, अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी ५०० रूपये दिवाळी भेट देण्याचे जाहीर केले होते. या प्रस्तावाला आजच्या आरोग्य समिती सभेने मान्यता दिली.आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या १ हजार १३५ पाणी नमुन्यांपैकी १७५ पाणी नमुने म्हणजेच १० टक्के पाणी नमुने दूषित आढळले होते. यात कणकवली व वैभववाडी तालुक्यातील पाणी नमुने जास्त दूषित आढळले होते. त्यानंतर वरील सर्व दूषित पाणी स्त्रोत शुद्ध करण्यात आले आहेत.