शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

झेडपीचे मिशन आता दहा हजार कुटुंबांना घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:50 IST

सातारा : ‘ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिला क्रमांक सातारा जिल्ह्याने पटकाविल्यानंतर आता दिवाळीपूर्वी दहा हजार कुटुंबांना हक्काचं घर देण्याचे मिशन हाती घेतले आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. कैलास शिंदे म्हणाले, ‘ आपल्या सातारा जिल्ह्यास जसा क्रांतीचा वारसा लाभला आहे. तसाच ...

सातारा : ‘ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिला क्रमांक सातारा जिल्ह्याने पटकाविल्यानंतर आता दिवाळीपूर्वी दहा हजार कुटुंबांना हक्काचं घर देण्याचे मिशन हाती घेतले आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. कैलास शिंदे म्हणाले, ‘ आपल्या सातारा जिल्ह्यास जसा क्रांतीचा वारसा लाभला आहे. तसाच उत्तम प्रशासनाचा ग्रामविकासाच्या प्रत्येक संकल्पना या मातीत रुजल्या. बहरल्या व साकारल्या आहेत.संपूर्ण देशाला पथदर्शी ठरवणारे अनेक यशस्वी प्रयोग साताऱ्यात झाले. केंद्र शासन आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनेक कार्यक्रमांची आपल्या जिल्ह्याने यशस्वी अंमलबजावणी करून देशासमोर आदर्श निर्माण केला आहे.केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये संपूर्ण देशातील ७१८ जिल्ह्याचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १६ गावांची केंद्रीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली.हा गौरव स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाºया सर्वांचा आहे. एकूण १०० गुणांकनामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या कार्यामुळे ३५ गुण प्राप्त झाले. तसेच नागरिकांकडून मोबाईल अभिप्रायासाठीचे पाच गुण प्राप्त झाले आहेत.शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, बाजारस्थळे, धार्मिक ठिकाणांची व सार्वजनिक जागेतील स्वच्छतेच्या निरीक्षणासाठीच्या ३० गुणांपैकी २९.४४ इतके गुण प्राप्त झाले. जिल्ह्यात स्वच्छतेविषयक सुविधा व सातत्य निर्माण केल्याने सर्व जिल्ह्यात सर्वोच्च गुण म्हणजे ९७.९० टक्के इतके गुण प्राप्त झाल्याने देशातील पहिला जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची निवड झाली.आता आणखी जबाबदारी वाढली असून, नागरिकांना हक्काचं घरकुल देण्याचं मिशन हाती घेतले आहे. ९०७ कुटुंबांना जमीन नाही. या लोकांना शासकीय जमीन देऊन घरे बांधण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण केले जाणार आहे.सध्या ७ हजार ३४९ घरे पूर्ण झाली आहेत. केवळ अडीच हजार घरे बांधणे बाकी आहे. ही सर्व घरे दिवाळीपूर्वी बांधून पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानंतर दहा हजार घरांचे उद्दिष्ट्य पूर्णहोणार आहे. त्यामुळे अनेकांना दिवाळीपूर्वी हक्काच घर मिळणार आहे.पेट्रोलपंप चालकांना नोटीस देणार..प्रत्येक पेट्रोल पंपावर शौचालय आणि इतर स्वच्छतेबाबत सुविधा नसतील त्या पेट्रोलपंप मालकांना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. तसेच हॉटेल मालकांनाही स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.