शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला जोरात मार्केटिंग करणार

By admin | Updated: July 9, 2014 00:02 IST

पृथ्वीराज चव्हाण : सध्याचे युग मार्केटिंगचे

कऱ्हाड : ‘ज्या योजना आम्ही राबविल्या, त्याचा लाभ लोकांना होत आहे. त्यामुळे त्या आम्हीच मंजूर केल्या हे त्यांना माहीत असणारच; पण तरीही लोकसभेचा निकाल पाहता सध्याचे युग मार्केटिंगचे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हीही मार्केटिंग करू,’ अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री आज, मंगळवारी कऱ्हाड दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, राहुल चव्हाण, शिवराज मोरे, आदी उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्प मांडला; पण त्यात महाराष्ट्राची पूर्ण निराशा झाली आहे. आधी साडेचौदा टक्के दरवाढ करता, आम्ही आंदोलन केल्यानंतर ती मागे घेता आणि पुन्हा रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडाला पाने पुसता, याचा मी निषेध करीत आहे. दरवाढ केली नसती तर दोन महिन्यांत रेल्वे बंद पडली असती, अशी वल्गना करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आता त्याचे स्पष्टीकरण जनतेला द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. रेल्वे मंत्रालय बुलेट ट्रेनची भाषा करीत आहे; परंतु ज्या मुंबईमध्ये एक कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात, त्यांचा विचार करताना मात्र दिसत नाही. त्यांची बुलेट ट्रेनबाबतची काय धोरणे आहेत ते त्यांनी स्पष्ट करायला पाहिजेत. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांची एकाच वेळी निर्मिती झाली. महाराष्ट्र आजही गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत विकासाची भरपूर कामे करूनही लोकांपर्यंत पोहोचू शकला नाहीत, त्यामुळेच पक्षाचा पराभव झाला काय, असा प्रश्न विचारताच ‘ज्या योजना आम्ही राबविल्या त्याचा लाभ लोकांना होत आहे. त्यामुळे त्या आम्हीच मंजूर केल्या, हे त्यांना माहीत असणारच; पण तरीही लोकसभेचा निकाल पाहता सध्याचे युग मार्केटिंगचे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हीही मार्केटिंग करू’, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘जागा वाटप’ माध्यमांशी बोलण्याचा विषय नाही!राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेसाठी फिप्टी-फिप्टी जागांची मागणी करीत आहे, असे विचारले असता ‘तो माध्यमांशी बोलण्याचा विषय नाही. याची चर्चा पक्षांतर्गत बैठकीत होणे अपेक्षित आहे. आणि दोन्ही पक्षांचे नेते त्यावर निर्णय घेतील. आम्ही पाच निवडणुका एकत्रित लढलोय. तुम्ही चिंता करू नका’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)