शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

जिल्हा परिषद शिक्षकांनी अधिकारी घडवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

सातारा : जिल्हा परिषद शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. ज्ञानदानात या शाळांचे शिक्षक कुठेही कमी नाहीत. सामाजिक क्षेत्रांमध्ये ...

सातारा : जिल्हा परिषद शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. ज्ञानदानात या शाळांचे शिक्षक कुठेही कमी नाहीत. सामाजिक क्षेत्रांमध्ये तसेच देशाच्या व राज्याच्या प्रशासनात उच्चपदावर काम करणारे अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत. शिक्षकांनी पुढील काळातही अशाच पद्धतीने विद्यार्थी घडावावेत, अशा भावना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांतील ‘आदर्श प्राथमिक शिक्षक’ पुरस्काराचे वितरण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बाल विकास सभापती सोनाली पोळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, अरुण गोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखाधिकारी विकास सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोरोना संसर्गामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले. अशा काळातही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे चांगले काम शिक्षक करीत आहेत. जिल्हा परिषदेचा शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. हा दर्जा वाढविण्यासाठी स्मार्ट टीव्ही, संगणक देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्मार्ट बोर्डसाठी चार कोटींची तरतूदही केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने काम केले. ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. लवकर कोरोनाचे संकट दूर होईल आणि पुन्हा शाळा गजबजून जातील.

यावेळी जिल्हा परिषदेच्या ४५ शिक्षकांना शाल, प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी शैक्षणिक आढावा घेतला. या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षिका व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

(चौकट)

जिल्ह्यातील ९५ टक्के

शाळा डिजिटल : कबुले

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील ९५ टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही अशा ठिकाणी भेट देऊन मुलांना शिक्षण दिले जात आहे. खासगी शाळांमुळे स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी केले. तर जिल्हा परिषदेच्या शाळांना नवलौकिक मिळावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.

फोटो : ०६ पुरस्कार सोहळा

जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, उदय कबुले, प्रदीप विधाते, विनय गौडा आदी उपस्थित होते.