शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

जिल्हा परिषदेचे कामकाज १५ टक्के कर्मचाऱ्यांवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, जिल्हा परिषदेमध्येही कर्मचारी बाधित होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद ...

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, जिल्हा परिषदेमध्येही कर्मचारी बाधित होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आता १५ टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू केले आहे. रोटेशन पद्धतीने कर्मचारी व अधिकारी कामावर येणार आहेत, तर अत्यावश्यक सेवा देणारे विभाग पूर्णपणे चालू राहणार आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये मागील दोन महिन्यांपासून बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमधील अनेक कर्मचारीही संसर्गित झाले आहेत. त्यातच जिल्ह्यातून दररोज अनेक नागरिक जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमध्ये कामकाजासाठी येतात, त्यामुळे संसर्गाची भीती असते. हे टाळण्यासाठी शासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने सूचना केली आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेमध्येही १५ टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू झाले आहे. तसेच रोटेशन पद्धतीने कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना कामावर हजर राहावे लागणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेंतर्गत अत्यावश्यक सेवा देणारे विभाग हे पूर्णपणे चालू राहणार आहेत. यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा व मान्सूनपूर्व कामे करणारे विभाग सुरू राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये मागील दोन दिवसांत अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

फोटो दिनांक २६सातारा झेडपी... मेलवर

फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर १५ टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. त्यामुळे अनेक विभागात काही टेबल मोकळे दिसत आहेत. (छाया : नितीन काळेल)