शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

टोल भरताच यमदूताचे दर्शन

By admin | Updated: November 23, 2014 23:43 IST

आनेवाडीजवळ धोका : महामार्ग प्राधिकरण, ठेकेदाराचे दुर्लक्ष; वर्षापासून रेंगाळले पुलाचे काम

कुडाळ : भरमसाठ टोल वसुली करून वाहनचालकांचा खिसा कापणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपनीने प्रवासी, वाहनचालकांच्या जीवाशी अक्षरश: खेळ मांडला आहे. मुळात हा चौपदरी रस्ता व्यवस्थित नसताना सहापदरी रस्ता करण्याचा घाट घातला आहे. मात्र, ठिकठिकाणी पुलांची, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याजवळच पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे या ठिकाणी खंडाळ्यातील अपघाताची पुनरावृत्ती होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तरी तातडीने या पुलाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी होत आहे.आनेवाडी हे जावळीचे प्रवेशद्वार ओह. वरील २० ते २५ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याजवळ वर्षभरापासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच लेनवरून सुरू आहे. टोलनाक्यावर गर्दी होऊन ट्रॅफिक जाम झाले की आनेवाडीकडून आलेल्या वाहनांना मार्गच मिळत नाही. याच ठिकाणी रिक्षा थांबा, बस थांबा देखील आहे. या थांब्यावर वाई, पुण्याकडे जाणारे शेकडो प्रवासी एसटीची वाट पाहत उभे असतात. साताराकडून उताराने अनेक वाहने वेगाने येऊन ताबा सुटल्याने अनेकदा या ठिकाणी फसली आहेत. आतापर्यंत जीवित हानी झाली नसली तरीदेखील वाहतूक अशीच एकेरी राहिली तर खंडाळ्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. तसेच याच ठिकाणी ठेकेदाराने महामार्गालगत मोठा खड्डा खणल्याने आजूबाजूच्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी महामार्गावर सुरू असलेल्या पुलांची कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊनही कंत्राटदाराकडून या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या या पुलाचे काम कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)नको हा टोलनाकाटोलनाक्यावर अनेकदा गाड्यांची दोन्ही बाजूला भली मोठी रांग लागते. त्यातच या अर्धवट पुलाचा अडथळा. सातारकडून रांग लागली की आनेवाडीच्या वरील गावांमधून येणाऱ्या वाहनांना तासन्तास महामार्ग मोकळा होण्याची वाट पाहावी लागते. कारण ज्या ठिकाणी हा रस्ता महामार्गाला मिळतो, तिथेच या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एकाच लेनवरून वाहतूक सुरू असते. त्यामुळे आनेवाडीकडून येणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांवर ‘नको हा आनेवाडी टोलनाका’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्गालगत असलेल्या आनेवाडी फाट्यावर जवळपास वीस रिक्षा रात्रंदिवस उभ्या असतात. कधी-कधी मोठे सोळा चाकी ट्रेलर वेगात येतात. अशावेळी ते रिक्षावर येतात की काय अशी भीती वाटते. त्यामुळे आम्ही रिक्षास्टॉपवर उभ्या करून बाजूला बसण्यास सुरुवात केली आहे.- जीवन कर्पे,रिक्षाचालक, आनेवाडीआनेवाडी टोलनाक्याजवळच वर्षभरापासून पुलाचे काम सुरू असल्यामुळे एकाच लेनवरून सुरू असलेली वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे.