शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

टोल भरताच यमदूताचे दर्शन

By admin | Updated: November 23, 2014 23:43 IST

आनेवाडीजवळ धोका : महामार्ग प्राधिकरण, ठेकेदाराचे दुर्लक्ष; वर्षापासून रेंगाळले पुलाचे काम

कुडाळ : भरमसाठ टोल वसुली करून वाहनचालकांचा खिसा कापणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपनीने प्रवासी, वाहनचालकांच्या जीवाशी अक्षरश: खेळ मांडला आहे. मुळात हा चौपदरी रस्ता व्यवस्थित नसताना सहापदरी रस्ता करण्याचा घाट घातला आहे. मात्र, ठिकठिकाणी पुलांची, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याजवळच पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे या ठिकाणी खंडाळ्यातील अपघाताची पुनरावृत्ती होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तरी तातडीने या पुलाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी होत आहे.आनेवाडी हे जावळीचे प्रवेशद्वार ओह. वरील २० ते २५ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याजवळ वर्षभरापासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच लेनवरून सुरू आहे. टोलनाक्यावर गर्दी होऊन ट्रॅफिक जाम झाले की आनेवाडीकडून आलेल्या वाहनांना मार्गच मिळत नाही. याच ठिकाणी रिक्षा थांबा, बस थांबा देखील आहे. या थांब्यावर वाई, पुण्याकडे जाणारे शेकडो प्रवासी एसटीची वाट पाहत उभे असतात. साताराकडून उताराने अनेक वाहने वेगाने येऊन ताबा सुटल्याने अनेकदा या ठिकाणी फसली आहेत. आतापर्यंत जीवित हानी झाली नसली तरीदेखील वाहतूक अशीच एकेरी राहिली तर खंडाळ्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. तसेच याच ठिकाणी ठेकेदाराने महामार्गालगत मोठा खड्डा खणल्याने आजूबाजूच्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी महामार्गावर सुरू असलेल्या पुलांची कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊनही कंत्राटदाराकडून या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या या पुलाचे काम कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)नको हा टोलनाकाटोलनाक्यावर अनेकदा गाड्यांची दोन्ही बाजूला भली मोठी रांग लागते. त्यातच या अर्धवट पुलाचा अडथळा. सातारकडून रांग लागली की आनेवाडीच्या वरील गावांमधून येणाऱ्या वाहनांना तासन्तास महामार्ग मोकळा होण्याची वाट पाहावी लागते. कारण ज्या ठिकाणी हा रस्ता महामार्गाला मिळतो, तिथेच या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एकाच लेनवरून वाहतूक सुरू असते. त्यामुळे आनेवाडीकडून येणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांवर ‘नको हा आनेवाडी टोलनाका’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्गालगत असलेल्या आनेवाडी फाट्यावर जवळपास वीस रिक्षा रात्रंदिवस उभ्या असतात. कधी-कधी मोठे सोळा चाकी ट्रेलर वेगात येतात. अशावेळी ते रिक्षावर येतात की काय अशी भीती वाटते. त्यामुळे आम्ही रिक्षास्टॉपवर उभ्या करून बाजूला बसण्यास सुरुवात केली आहे.- जीवन कर्पे,रिक्षाचालक, आनेवाडीआनेवाडी टोलनाक्याजवळच वर्षभरापासून पुलाचे काम सुरू असल्यामुळे एकाच लेनवरून सुरू असलेली वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे.