शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आपलेच उलट्या काळजाचे निघाले

By admin | Updated: February 14, 2017 21:54 IST

उदयनराजे भोसले; बंडखोरी करणाऱ्यांशी आता संबंध राहणार नाही

सातारा : ‘क्षमता नसलेल्या व्यक्तींनी पूर्वीची करणी-भरणी सोडून, सातारा विकास आघाडीमधून बंडखोरी केली आहे. साविआ विरुद्ध बंडखोरी केलेल्यांना, जनता झिडकारणारच आहे. परंतु येथून पुढे अशा बंडखोरांचा विशेष करून शेंद्रे गटातील बंडखोरांचा आमच्याशी संबंध राहणार नाही. ज्या लोकांना आपलं समजत होतो तेच उलट्या काळजाचे निघाले,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी बंडखोरांना फटकारले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातउदयनराजे यांनी म्हटले आहे की, ‘सुनील काटकर यांच्यासह रवी साळुंखे यांच्यावर आमच्या बरोबरीने तालुक्याची जबाबदारी आहे. ती सांभाळताना, साविआला नियोजनात्मक आणि संघटनात्मक कमतरता भासू नये म्हणून, शेंद्रे गटातून सुनील काटकर यांनी आपले मन मोठे करत, तरुणांना संधी मिळावी आणि ‘साविआ’ला नुकसान पोहोचू नये याकरिता उमेदवारी मागे घेतली.’ (प्रतिनिधी)राजकीय आत्मघात करून घेतला..‘साविआला एकत्र कुटुंब म्हणून आम्ही मानत आलो आहे. एकत्र कुटुंबात थोड्या फार कुरबुऱ्या नेहमीच होत असतात. तथापि, वेळ आली की, कुटुंबातील एकीपुढे दुनियेला झुकवण्याची शक्ती असली पाहिजे, अशी धारणा राहिलेली आहे. तथापि, ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी खरेतर त्यांचाच राजकीय आत्मघात करून घेतला आहे. आमच्याशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांनाही त्यांच्याकडून तिलांजली देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे अशा व्यक्तींशी संबंध राहणार नाही,’ असेही खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे.