शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खेळ होतोय तुमचा.. जीव जातोय आमचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

पेट्री : जिल्ह्यासह सातारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवा लावण्याच्या घटनांत वाढ झाली असतानात रविवारी जैवविविधतेने नटलेला कास तलाव ...

पेट्री : जिल्ह्यासह सातारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवा लावण्याच्या घटनांत वाढ झाली असतानात रविवारी जैवविविधतेने नटलेला कास तलाव परिसर व गणेशखिंड पठारही वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडला. या वणव्यात वृक्षसपंदेची हानी तर झालीच शिवाय हजारो पशू-पक्ष्यांची घरटीही जळून खाक झाली. विघ्नसंतोषींकडून अशा घटना सातत्याने वाढू लागल्याने ‘खेळ होतोय तुमचा.. जीव जातोय आमचा’ अशी आर्त हाक पशू-पक्ष्यांकडून दिली जात आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेकडील परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यावर येथील पशूधन पोसलं जातं. एवढंच काय येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांचीदेखील भूक भागते. अशा या परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विघ्नसंतोषींकडून वणवा लावण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

कास तलावाचा परिसरात रविवारी दुपारी लागलेल्या वणव्यात वनसंपदेसह प्राणीसंपदेचीही मोठी हानी झाली. कास पठार कार्यकारिणी समितीचे कर्मचारी गणेश आटाळे, अंकुश अहिरे, भगवान आखाडे, गणेश चिकणे, महेश कदम यांनी झाडाच्या फांद्या आणि फायरगनद्वारे दोन तास अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. यापाठोपाठ विघ्नसंतोषींकडून गणेशखिंड पठारावरही वणवा लावण्यात आला. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले व बघता-बघता संपूर्ण पठार आगीत खाक झाले. या आगीत पशू-पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली, तर मोठ्या प्रमाणात गवतही जळाले. आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की दूर अंतरावरूनही ही आग नजरेस पडत होती.

पश्चिम भागात शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करतात. मात्र, सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे पश्चिम, तसेच दुष्काळी भागातील जनावरांना पोसणारा हा चारा नष्ट होत असल्याने पशूपालकांपुढे जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

(चौकट)

मुक्या पशुपक्ष्यांचा आक्रोश..

वणव्यात पशूपक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. अनेक घरटी त्यातीत अंडी व पिलेही जळून खाक झाली. ज्या ठिकाणी वणवा लागला त्या ठिकाणी अनेक पशू-पक्षी आभाळात घिरट्या घालताना दिसून आले. पशू-पक्ष्यांचा हा चिवचिवाट मन हेलावून टाकणारा होता.

(चौकट)

बेजबाबदार वृत्तीला

लगाम घालणार कोण?

वाहने चालविताना पेटती सिगारेट, काडी पेटीची काडी वाटेल तेथे टाकली जाते. त्यामुळे वणवे लागत आहेत. यामध्ये कित्येक वन्यजिवांचा हकनाक बळी जात असून, पशुपक्ष्यांच्या निवाऱ्यांनादेखील धोका निर्माण होत आहे. तसेच या वणव्यामुळे येथील वनसंपदा धोक्यात येऊ लागली आहे. काही अतिउत्साही पर्यटकांकडून वणवा लावला गेल्याने यवतेश्वर-कास मार्गावर हजारो टन चारा जळून खाक झाला आहे. अशा बेजबाबदार वृत्तीला व हुल्लडबाजीला आवर घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

(चौकट)

वणव्यामुळे हे झाले...

- हजारो टन चारा नष्ट

- पशू-पक्ष्यांचे निवारे नष्ट

- वृक्ष व प्राणीसंपदेचे अस्तित्व धोक्यात

- वन्यजिवांच्या अधिवासात बदल

- धुरामुळे वायू प्रदूषण.

- गवताची कुरणं, हिरवी झाडे होरपळली

- फळे, रानमेवा नष्ट

- परागीभवन करणारे कीटक व इतर जीव आगीच्या भक्ष्यास्थानी

फोटो : ०७ सागर चव्हाण ०१/०२

कास तलाव परिसर व गणेशखिंड पठारावर रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वणवा लागला. या वणव्यात गवताच्या कुरणांनी बहरून गेलेले गणेशखिंड पठार आगीनंतर असे काळेकुट्ट झाले. (छाया : सागर चव्हाण)