शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी शिवरायांचे विचार जपावेत : उदयनराज

By admin | Updated: February 15, 2015 23:41 IST

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय : शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी, नाणी, शस्त्रांचे प्रदर्शने

सातारा : ‘देशातील माणसांचा आचार-विचार, संस्कृती बदलून माणुसकी नष्ट होत आहे. देश गुलामगिरीकडे वळत आहे. देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. प्रत्येक भारतीयांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा, स्फूर्ती घेऊन प्रत्येकांनी छत्रपतींच्या विचारांचा वारसा आचरणात आणणे काळाची गरज आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऐतिहासिक व शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी व नाणी, ग्रंथ, शिवकालीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ होते.यावेळी माजी नगराध्यक्ष नासिर शेख, नगरसेवक प्रकाश बडेकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, प्रतिभा चिकमठ, प्रा. दीपक जाधव, उपप्राचार्य डॉ. आर. जी. पाटील, प्रा. दशरथ साळुंखे उपस्थित होते. उदयनराजे भोलसे म्हणाले, ‘परदेशी कंपन्या व पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण देशात केले जात आहे. गॅट करार व जागतिकीकरणामुळे देशातील विविध राजकीय पक्ष, देशप्रेम, भक्तिभाव संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, हे सर्व टाळण्यासाठी देशाला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे.’प्राचार्य शेजवळ म्हणाले, ‘सातारा या शाहूनगरीला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे. छत्रपतींनी सर्वांना माणुसकी व धर्माचे पालन करण्याची शिकवण दिली. महाविद्यालयाने शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा इतिहास महोत्सवातून जपला आहे.’प्रा. मयुरा राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक प्रा. दीपक जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)