शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तरुणांनी शिवरायांचे विचार जपावेत : उदयनराज

By admin | Updated: February 15, 2015 23:41 IST

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय : शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी, नाणी, शस्त्रांचे प्रदर्शने

सातारा : ‘देशातील माणसांचा आचार-विचार, संस्कृती बदलून माणुसकी नष्ट होत आहे. देश गुलामगिरीकडे वळत आहे. देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. प्रत्येक भारतीयांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा, स्फूर्ती घेऊन प्रत्येकांनी छत्रपतींच्या विचारांचा वारसा आचरणात आणणे काळाची गरज आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऐतिहासिक व शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी व नाणी, ग्रंथ, शिवकालीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ होते.यावेळी माजी नगराध्यक्ष नासिर शेख, नगरसेवक प्रकाश बडेकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, प्रतिभा चिकमठ, प्रा. दीपक जाधव, उपप्राचार्य डॉ. आर. जी. पाटील, प्रा. दशरथ साळुंखे उपस्थित होते. उदयनराजे भोलसे म्हणाले, ‘परदेशी कंपन्या व पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण देशात केले जात आहे. गॅट करार व जागतिकीकरणामुळे देशातील विविध राजकीय पक्ष, देशप्रेम, भक्तिभाव संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, हे सर्व टाळण्यासाठी देशाला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे.’प्राचार्य शेजवळ म्हणाले, ‘सातारा या शाहूनगरीला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे. छत्रपतींनी सर्वांना माणुसकी व धर्माचे पालन करण्याची शिकवण दिली. महाविद्यालयाने शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा इतिहास महोत्सवातून जपला आहे.’प्रा. मयुरा राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक प्रा. दीपक जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)