शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुण-तरुणीचा मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:38 IST

सातारा : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुण आणि तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शहरापासून जवळच असलेल्या जकातवाडी अन् डबेवाडी ...

सातारा : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुण आणि तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शहरापासून जवळच असलेल्या जकातवाडी अन् डबेवाडी येथे घडली. या भटक्या कुत्र्यांनी माणसांचे आणि जनावरांचे लचके तोडतच धुमाकूळ घातला. यात पाच नागरिक जखमी झाले असून, एका रेडकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही गावांत भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत पसरली असून, ग्रामस्थ अक्षरश: भयभीत झाले आहेत.

देवानंद गोरखनाथ लोंढे (वय २३, रा. जकातवाडी, ता. सातारा), रूपाली बबन माने (२१, रा. डबेवाडी, ता. सातारा) अशी भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवानंद लोंढे हा २२ डिसेंबर २०२० रोजी गुरे चारण्यासाठी शेतात गेला होता. त्यावेळी त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला. देवानंद हा तब्बेतीने अत्यंत सुदृढ होता. मात्र, तरीही भटक्या कुत्र्याने उडी घेऊन त्याच्या कानाचा आणि मानेचा चावा घेतला. त्यानंतर भटकी कुत्री जकातवाडीत आली. पाच नागरिक, एक गाय, रेडकू आणि बैलाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर हीच कुत्री पुढे डबेवाडीत गेली. दुसऱ्यादिवशी म्हणजे २३ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता रूपाली माने ही तरुणी एसटीने कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. रस्त्यावर आल्यानंतर अचानक कुत्र्याने तिच्या तोंडावर हल्ला केला. कपाळाच्या मधोमध कुत्र्याने चावा घेतल्याने ती रक्तबंबाळ झाली. दरम्यान, देवानंद आणि रूपालीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, चार दिवसांनंतर पुन्हा दोघांनाही अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना ११ जानेवारीला पहिल्यांदा रूपालीचा, तर त्यानंतर देवानंदचा दि. २१ जानेवारीला मृत्यू झाला.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अशाप्रकारे तरुण, तरुणीचा मृत्यू झाल्याने दोन्ही गावातील लोक अक्षरश: हादरून गेले आहेत. ही घटना महिन्याभरापूर्वी घडली असली, तरी अद्यापही या कुत्र्यांची दहशत गावात आहे. या गावांच्या शेजारी सताऱ्याचा कचरा डेपो आहे. या डेपोवर भटक्या कुत्र्यांचा नेहमी वावर असतो. शिळे अन्न व काही विषारी द्रव कुत्र्यांनी सेवन केले असावे, त्यामुळेच कुत्री पिसळली गेली. भटक्या कुत्र्यांचे टोळके दोन्ही गावच्या परिसरातून फिरत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

फोटो: २३ रूपाली माने

२३ देवानंद लोंढे