शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

पुसेगावला नशीब आजमावताहेत तरुण उमेदवार

By admin | Updated: August 2, 2015 22:04 IST

हायटेक प्रचार : ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत

शेखर जाधव- वडूज -पुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे दिग्गज नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. १७ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात असल्याने आणि तिरंगी लढतीत युवक उमेदवारीमुळे परिवर्तनाची लाट असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे.पुसेगाव येथील नेतेमंडळी व मतदारराजांचे अनोखे नाते याठिकाणी पाहावयास मिळते. समोरासमोर एकमेकांविरोधात उभे ठाकलेले उमेदवारांचा प्रचार पूर्ण ताकदीने; परंतु हसत-खेळत सुरू आहे. याठिकाणी तीन पॅनेलमध्ये कधीच लढत झालेली नाही. परंतु बदलत्या परिस्थितीत लोकशाहीची पाळेमुळे अगदी खोलवर गेल्याने राजकारणातील सत्ता, राजकारण व संधी असे चित्र येथे पाहावयास मिळत आहे.पुसेगावच्या राजकारणात राजकीय पातळीवरील सर्व नेत्यांनी मतदानापुरते राजकारण व नंतर गावचा विकास, असाच कारभार केला. जुन्या राजकारण्याची पद्धती किंवा राजकीय डावपेच बदलले आणि मतदारराजांच्या सुपीक डोक्यातून सत्ता बदलाचे वारे वाहू लागले. आधुनिकीकरणाच्या युगात सतत बदलाचेच वारे वाहत असते. त्यामुळे येथील निवडणुकीत रंगत येत आहे.शिवाजी वॉर्ड १, धनाजी वॉर्ड २ आणि सेवागिरी वॉर्ड ३ मध्ये काँटे की टक्कर असून, इतर ठिकाणी ही अशीच संमिश्र परिस्थिती आहे. सरपंचपद ओबीसी महिला आरक्षित असल्याने सुशिक्षित महिलांना संधी देण्यात नेत्यांनी धन्यता मानली आहे. श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेचे पॅनेलप्रमुख माजी उपसरपंच रणधीर जाधव यांनी स्थानिक युवक वर्गाची संघटना स्थापना करून विरोधकांपुढे आव्हान उभे केले आहे. तर श्री सेवागिरी नागरी संघटनेचे प्रमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, सुनील जाधव यांनी जुन्या-नव्यांना बरोबर घेऊन राजकीय वातावरण तापविले आहे. माजी आमदार तात्याराव जाधव यांनी गाव कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी पॅनेल टाकून सत्ताधाऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे.सोशल मीडियाचा वापरपहिल्यांदाच निवडणुकीमध्ये एकूण तीन पॅनेल समोरासमोर आली असून, वॉर्डमधील लढती लक्षवेधी ठरणार असल्याने सर्व पॅनेल प्रमुख, उमेदवार व कार्यकर्ते प्रचारात व आपले चिन्ह पोहोचविण्यात कोठेही कमी पडत नाहीत. तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मतदाराला मतदानासाठी प्रचार करताना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व प्रत्यक्ष मोबाइलवरुन संपर्क साधून चिन्ह वधवून घेतले जात असल्याचे चित्रही सध्या पाहावयास मिळत आहे. पॅनेलप्रमुख रणधीर जाधव आणि सुनील जाधव ही रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.सहा वॉर्डात ४९ उमेदवारएकूण १७ जागांसाठी सहा वॉर्डमधून ४९ उमेदवार रिंगणात असल्याने जरी मतदारांना संभ्रमित करणारी परिस्थिती निर्माण झाली असली तरी तरुणांच्या हातात सत्ता असावी, असा मतदारांचा कौल परिवर्तनाची लाट निर्माण करेल, असेच वातावरण बनले आहे. सर्व पॅनेलप्रमुखांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचून आपला जाहीरनामा व आश्वासने जरी दिली असली तरी मतदानानंतर उमेदवारांचे नशीब उघडणार आहे.