शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

पुसेगावला नशीब आजमावताहेत तरुण उमेदवार

By admin | Updated: August 2, 2015 22:04 IST

हायटेक प्रचार : ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत

शेखर जाधव- वडूज -पुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे दिग्गज नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. १७ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात असल्याने आणि तिरंगी लढतीत युवक उमेदवारीमुळे परिवर्तनाची लाट असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे.पुसेगाव येथील नेतेमंडळी व मतदारराजांचे अनोखे नाते याठिकाणी पाहावयास मिळते. समोरासमोर एकमेकांविरोधात उभे ठाकलेले उमेदवारांचा प्रचार पूर्ण ताकदीने; परंतु हसत-खेळत सुरू आहे. याठिकाणी तीन पॅनेलमध्ये कधीच लढत झालेली नाही. परंतु बदलत्या परिस्थितीत लोकशाहीची पाळेमुळे अगदी खोलवर गेल्याने राजकारणातील सत्ता, राजकारण व संधी असे चित्र येथे पाहावयास मिळत आहे.पुसेगावच्या राजकारणात राजकीय पातळीवरील सर्व नेत्यांनी मतदानापुरते राजकारण व नंतर गावचा विकास, असाच कारभार केला. जुन्या राजकारण्याची पद्धती किंवा राजकीय डावपेच बदलले आणि मतदारराजांच्या सुपीक डोक्यातून सत्ता बदलाचे वारे वाहू लागले. आधुनिकीकरणाच्या युगात सतत बदलाचेच वारे वाहत असते. त्यामुळे येथील निवडणुकीत रंगत येत आहे.शिवाजी वॉर्ड १, धनाजी वॉर्ड २ आणि सेवागिरी वॉर्ड ३ मध्ये काँटे की टक्कर असून, इतर ठिकाणी ही अशीच संमिश्र परिस्थिती आहे. सरपंचपद ओबीसी महिला आरक्षित असल्याने सुशिक्षित महिलांना संधी देण्यात नेत्यांनी धन्यता मानली आहे. श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेचे पॅनेलप्रमुख माजी उपसरपंच रणधीर जाधव यांनी स्थानिक युवक वर्गाची संघटना स्थापना करून विरोधकांपुढे आव्हान उभे केले आहे. तर श्री सेवागिरी नागरी संघटनेचे प्रमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, सुनील जाधव यांनी जुन्या-नव्यांना बरोबर घेऊन राजकीय वातावरण तापविले आहे. माजी आमदार तात्याराव जाधव यांनी गाव कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी पॅनेल टाकून सत्ताधाऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे.सोशल मीडियाचा वापरपहिल्यांदाच निवडणुकीमध्ये एकूण तीन पॅनेल समोरासमोर आली असून, वॉर्डमधील लढती लक्षवेधी ठरणार असल्याने सर्व पॅनेल प्रमुख, उमेदवार व कार्यकर्ते प्रचारात व आपले चिन्ह पोहोचविण्यात कोठेही कमी पडत नाहीत. तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मतदाराला मतदानासाठी प्रचार करताना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व प्रत्यक्ष मोबाइलवरुन संपर्क साधून चिन्ह वधवून घेतले जात असल्याचे चित्रही सध्या पाहावयास मिळत आहे. पॅनेलप्रमुख रणधीर जाधव आणि सुनील जाधव ही रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.सहा वॉर्डात ४९ उमेदवारएकूण १७ जागांसाठी सहा वॉर्डमधून ४९ उमेदवार रिंगणात असल्याने जरी मतदारांना संभ्रमित करणारी परिस्थिती निर्माण झाली असली तरी तरुणांच्या हातात सत्ता असावी, असा मतदारांचा कौल परिवर्तनाची लाट निर्माण करेल, असेच वातावरण बनले आहे. सर्व पॅनेलप्रमुखांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचून आपला जाहीरनामा व आश्वासने जरी दिली असली तरी मतदानानंतर उमेदवारांचे नशीब उघडणार आहे.