शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जग फिरून झाले, जरा देशही फिरून पाहा, राजू शेट्टींचा PM मोदींना खोचक सल्ला

By प्रमोद सुकरे | Updated: November 12, 2022 20:19 IST

"३ महिने वेळ काढून भारत यात्रा करा खरी वस्तुस्थिती कळेल"

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही चांगली बाब आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता जवळजवळ सगळे जग फिरून झाले आहे. त्यांनी आता जरा जवळून देशही फिरून पहावा .म्हणजे त्यांना खरी वस्तूची समजेल अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी  केली. कराड येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड तालुका अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, प्रमोद जगदाळे, सांगली जिल्हा अध्यक्ष पोपट मोरे, प्रवक्ते अँड . संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, राजकारणाचा स्तर सध्या अत्यंत खालच्या पातळीवरती गेलेला आहे. ही बाब लोकांना न पटणारी आहे. चुकीची भाषा वापरणाऱ्यांना जनता योग्य वेळी त्यांची जागाही दाखवतील.

मध्यावधीची शक्यता वाटत नाही- राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे का ?याबाबत विचारता शेट्टी म्हणाले ,हे सगळे सत्तेला लालसावलेले लोक आहेत. ते सत्तेचा पुरेपूर उपभोग घेतील. वाटल्यास त्यानंतर भांडतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीची शक्यता वाटत नाही.

त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय?- सीबीआय ईडीच्या वापराबाबत खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करून ईडीवर ठपका ठेवला आहे. याकडे लक्ष वेधले असता, न्यायालय तीन महिने काय करत होते? त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय? असा सवालही  त्यांनी केला.

मी बारीकसारीक संघटनेकडे लक्ष देत नाही- सध्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे देखील ऊस दर प्रश्नी भलतेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबत विचारताच शेट्टी म्हणाले, मी सध्या बारीक-सारीक संघटनेकडे लक्ष देत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaju Shettyराजू शेट्टी