शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

जग फिरून झाले, जरा देशही फिरून पाहा, राजू शेट्टींचा PM मोदींना खोचक सल्ला

By प्रमोद सुकरे | Updated: November 12, 2022 20:19 IST

"३ महिने वेळ काढून भारत यात्रा करा खरी वस्तुस्थिती कळेल"

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही चांगली बाब आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता जवळजवळ सगळे जग फिरून झाले आहे. त्यांनी आता जरा जवळून देशही फिरून पहावा .म्हणजे त्यांना खरी वस्तूची समजेल अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी  केली. कराड येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड तालुका अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, प्रमोद जगदाळे, सांगली जिल्हा अध्यक्ष पोपट मोरे, प्रवक्ते अँड . संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, राजकारणाचा स्तर सध्या अत्यंत खालच्या पातळीवरती गेलेला आहे. ही बाब लोकांना न पटणारी आहे. चुकीची भाषा वापरणाऱ्यांना जनता योग्य वेळी त्यांची जागाही दाखवतील.

मध्यावधीची शक्यता वाटत नाही- राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे का ?याबाबत विचारता शेट्टी म्हणाले ,हे सगळे सत्तेला लालसावलेले लोक आहेत. ते सत्तेचा पुरेपूर उपभोग घेतील. वाटल्यास त्यानंतर भांडतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीची शक्यता वाटत नाही.

त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय?- सीबीआय ईडीच्या वापराबाबत खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करून ईडीवर ठपका ठेवला आहे. याकडे लक्ष वेधले असता, न्यायालय तीन महिने काय करत होते? त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय? असा सवालही  त्यांनी केला.

मी बारीकसारीक संघटनेकडे लक्ष देत नाही- सध्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे देखील ऊस दर प्रश्नी भलतेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबत विचारताच शेट्टी म्हणाले, मी सध्या बारीक-सारीक संघटनेकडे लक्ष देत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaju Shettyराजू शेट्टी