शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

तुम लडो... हम कपडे संभालते हैं !

By admin | Updated: March 30, 2016 00:06 IST

पोलिस भरती : पहिल्या दिवशी ६०० उमेदवार; ४९१ जणांची सोळाशे मीटर धावण्याची उद्या चाचणी

सातारा : जिल्हा पोलिस दलात भरतीसाठी विविध चाचण्यांना मंगळवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी आठशे जणांना बोलाविण्यात आले होते. मात्र, ५९१ जणांनी हजेरी लावली. प्राथमिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या ४९१ जणांची सोळाशे मीटर धावण्याची चाचणी बुधवारी होणार आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची चांगली सोय पोलिस खात्याने केली होती. अगदी उमेदवारांची कपडे सांभाळण्यासाठी हवालदारही नेमला होता.पोलिस भरतीमुळे जुने आरटीओ कार्यालय ते पारंगे चौक रस्त्यावर पहाटेपासूनच उमेदवार आणि पालकांची गर्दी उसळली होती. हा रस्ता काही तासांसाठी बंद करण्यात आला होता. बाहेरगावाहून आलेले उमेदवार कागदपत्रे घेऊन उभे होते. कागदपत्र पडताळणीनंतर शारीरिक चाचण्या सुरू झाल्या. कागदपत्र पडताळणीत ४७ तर शारीरिक मोजमापांमध्ये ५३ असे शंभर उमेदवार अपात्र ठरले. शारीरिक मोजमापात छाती (न फुगवता आणि फुगवून), उंची आणि वजनाचे मोजमाप घेतले. पहिल्या दोन फेऱ्यांमधून पात्र ठरलेल्या ४९१ उमेदवारांची शंभर मीटर धावणे, लांब उडी, पुल-अप्स आणि गोळाफेक अशा चार चाचण्या घेण्यात आल्या. आता त्यांची सोळाशे मीटर धावण्याची चाचणी बाकी असून, ती बुधवारी पहाटे सोनगाव फाटा ते शेंद्रे फाटा या रस्त्यावर घेण्यात येणार आहे. दुपारपर्यंत हा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला असून, बोगद्याकडून शेंद्रे फाट्याकडे जाणारी वाहतूक सोनगाव फाट्यावरून सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमार्गे हायवेकडे वळविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)भूलथापांना बळी पडू नकापोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. पारदर्शकता राहावी यासाठी संपूर्ण भरतीप्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. तथापि, भरतीविषयी शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नका असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. आज ८०० उमेदवारबुधवारी (दि. ३०) ८०० उमेदवारांना भरतीसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यांना कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि इतर मैदानी चाचण्यांमधून पात्र ठरावे लागेल. नंतर त्यांची सोळाशे मीटर धावण्याची स्पर्धा होईल. अशा क्रमाने ही भरती प्रक्रिया दि. ५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.