शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

येरळाचा पूल २५ दिवसांपासून पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:36 IST

वडूज : गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने येरळवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आणि येरळा नदीचे पात्र सध्य:स्थितीला ...

वडूज : गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने येरळवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आणि येरळा नदीचे पात्र सध्य:स्थितीला दुथडी भरून वाहत आहे. या नदीपात्रावरील मोराळे गावाच्या हद्दीत निमसोड व मायणी या मोठ्या गावांना जोडणारा पूल गेल्या २५ दिवसांपासून अद्याप पाण्यात असून, लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी पुलाची उंची वाढवण्याची मागणी लोकांमधून होत आहे.कलेढोण, मायणीहून निमसोड, औंध, रहिमतपूर यामार्गे साताऱ्याला जाणारा हा रस्ता वाहनचालकांना सोयीस्कर व जवळचा आहे. पुसेगाव किंवा पुसेसावळीमार्गे साताºयाला जाणाºया रस्त्यापेक्षा निमसोडमार्गे जाणारा हा रस्ता सध्या चांगल्या अवस्थेत आहे. व्यावसायिकदृष्ट्या या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु मोराळे गावाच्या नजीक असणाºया पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने अनेक वर्षांतून वाहिलेल्या येरळा नदीचे उसळून वाहणारे पाणी उरात धडकी भरवत आहे.सध्या पूल बंद असल्याने म्हासुर्णेमार्गे मायणी किंवा वडूजमार्गे मायणी असा १० ते १५ किलोमीटरचा प्रवास आहे. काही वर्षांपूर्वी हा पूल वाहून गेला होता. त्यानंतर बांधलेल्या पुलाचे काम कमी उंचीचेच करण्यात आले. परंतु सध्या नेर येथील तलाव व येरळवाडी तलाव यासह खटाव, सिद्धेश्वर कुरोली, वडूज, कातरखटाव, पळसगाव या भागातून येणाºया अनेक नदीपात्रात व ओढ्यात अनेक बंधारे भरून वाहू लागले आहे.येरळा नदीच्या पात्रात येणाºया पाण्याचे प्रमाण खूप आहे. अद्याप पावसाने उसंती घेतली नसल्याने आणखी अनेक दिवस हा पूल पाण्याखालीच राहण्याची शक्यता आहे. या पुलाची उंची वाढवण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे .