शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

येरळाचा पूल २५ दिवसांपासून पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:36 IST

वडूज : गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने येरळवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आणि येरळा नदीचे पात्र सध्य:स्थितीला ...

वडूज : गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने येरळवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आणि येरळा नदीचे पात्र सध्य:स्थितीला दुथडी भरून वाहत आहे. या नदीपात्रावरील मोराळे गावाच्या हद्दीत निमसोड व मायणी या मोठ्या गावांना जोडणारा पूल गेल्या २५ दिवसांपासून अद्याप पाण्यात असून, लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी पुलाची उंची वाढवण्याची मागणी लोकांमधून होत आहे.कलेढोण, मायणीहून निमसोड, औंध, रहिमतपूर यामार्गे साताऱ्याला जाणारा हा रस्ता वाहनचालकांना सोयीस्कर व जवळचा आहे. पुसेगाव किंवा पुसेसावळीमार्गे साताºयाला जाणाºया रस्त्यापेक्षा निमसोडमार्गे जाणारा हा रस्ता सध्या चांगल्या अवस्थेत आहे. व्यावसायिकदृष्ट्या या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु मोराळे गावाच्या नजीक असणाºया पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने अनेक वर्षांतून वाहिलेल्या येरळा नदीचे उसळून वाहणारे पाणी उरात धडकी भरवत आहे.सध्या पूल बंद असल्याने म्हासुर्णेमार्गे मायणी किंवा वडूजमार्गे मायणी असा १० ते १५ किलोमीटरचा प्रवास आहे. काही वर्षांपूर्वी हा पूल वाहून गेला होता. त्यानंतर बांधलेल्या पुलाचे काम कमी उंचीचेच करण्यात आले. परंतु सध्या नेर येथील तलाव व येरळवाडी तलाव यासह खटाव, सिद्धेश्वर कुरोली, वडूज, कातरखटाव, पळसगाव या भागातून येणाºया अनेक नदीपात्रात व ओढ्यात अनेक बंधारे भरून वाहू लागले आहे.येरळा नदीच्या पात्रात येणाºया पाण्याचे प्रमाण खूप आहे. अद्याप पावसाने उसंती घेतली नसल्याने आणखी अनेक दिवस हा पूल पाण्याखालीच राहण्याची शक्यता आहे. या पुलाची उंची वाढवण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे .