शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

सहामाही परीक्षा होणार यंदा दोन टप्प्यांत --शिक्षकांवर ताणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:11 IST

सातारा : सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळेतील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा यंदा दोन टप्प्यांत होणार आहे.

ठळक मुद्दे : भाषा-गणित-विज्ञान-इंग्रजीचे पेपर दिवाळीच्या सुटीनंतर

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळेतील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा यंदा दोन टप्प्यांत होणार आहे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार गेल्या दोन वर्षांपासून सर्व व्यस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित विषयासाठी वर्षभरात तीन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चाचणी १ मध्ये पायाभूत चाचणी, चाचणी २ मध्ये संकलित मूल्यमापन १ चाचणी आणि चाचणी ३ मध्ये संकलित मूल्यमापन २ चाचणी घेण्यात येतात.सलग आलेले सण आणि शिक्षकांच्या बदल्यांमुळे शाळेवर गैरहजेरी यामुळे परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यानुसार दिवाळीआधी समाजशास्त्र, हिंदी, संस्कृत, कार्यानुभव याविषयांची परीक्षा होणार आहे. तर दिवाळीनंतर मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या चार विषयांची परीक्षा होणार आहे.सुटी जाणार अभ्यासात !परिक्षेनंतर येणारी सुटी मुलांसह पालकांनाही आनंदाची वाटते. पहिल्या सत्राच्या अभ्यासाच्या ताणातून मुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनाही सुटीत अभ्यास नकोसा वाटतो. शाळेत जायला लागल्यापासून दिवाळीची सुटी म्हणजे पहिल्या सत्राची समाप्ती असे गणित होते. यंदा मात्र परीक्षेचा निम्मा ताण सुटीनंतर असल्यामुळे यंदाची सुटी अभ्यासातच जाणार, अशी परिस्थिती दिसत आहे. 

सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना पहिली ते नववीपर्यंतच्या मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी याविषयांच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून येतात. यंदा मात्र ८ नोव्हेंबरनंतर या चार विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, याच्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आंतरिक मूल्यमापन शालेय स्तरावर दिवाळीच्या आधी होईल.- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, सातारा 

उन्हाळी आणि दिवाळी या दोन्ही सुटीमध्ये मी मुलांना घेऊन माहेरी जाते. मुलांच्या सुटीच्या निमित्ताने माहेरी जाता येते. यंदा मात्र परीक्षेची टांगती तलवार असल्यामुळे पर्यटन आणि पाहुण्यांकडे जाण्याचा बेत रद्द केला आहे.- ऐश्वर्या नारकर, पालक