शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

यंदाचा गणेशोत्सव थर्माकोलमुक्त; व्यापाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:57 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : न्यायालयाने थर्माकोलवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला असून, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील व्यापारी व गणेश मंडळांना बसला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, थर्माकोलपासून तयार केले जाणारे डेकोरेशन यंदाच्या उत्सवात पाहावयास मिळणार नाही. या बंदीमुळे व्यापाºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार असला तरी ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : न्यायालयाने थर्माकोलवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला असून, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील व्यापारी व गणेश मंडळांना बसला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, थर्माकोलपासून तयार केले जाणारे डेकोरेशन यंदाच्या उत्सवात पाहावयास मिळणार नाही. या बंदीमुळे व्यापाºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार असला तरी न्यायालयाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी कौतुक केले आहे.राज्य शासनाने २३ जूनपासून सर्वत्र प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला. या निर्णयाची प्रशासनाकडून सर्वत्र काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोलच्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करून दुकानदार व व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या पथकाने केलेल्या या कारवाईची धास्ती घेऊन दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर टाळला असला तरी थर्माकोलला या बंदीतून सूट द्यावी, अशी मागणी थर्माकोल फॅब्रिकेटर आणि डेकोरेशन समितीने उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवल्याने याचा मोठा फटका व्यापाºयांना बसला आहे.पूर्वी गणपती प्रतिष्ठापनेसाठी घरीच सजावट केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून थर्माकोलपासून बनविण्यात येणारी आसने, लायटिंगचे मंदिर, सिंहासन, पालखी अशा विविध आरास साहित्याची मागणी गणेश मंडळांकडून होऊ लागली आहे. गणेशोत्सवाच्या एक-दोन महिने अगोदर थर्माकोलचा वापर करून मकर व इतर वस्तू तयार केल्या जातात. उत्सवकाळात सजावटीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गणेशोत्सवात थर्माकोलच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा थर्माकोल बंदीमुळे ही उलाढाल थांबणार असून, पूर्वीप्रमाणेचे पारंपरिक रंगबिरंगी पडदे, कागद व लाकडापासून बनविल्या जाणाºया शोभिवंत वस्तूंना मागणी वाढणार आहे.हे आहेत तोटे...थर्माकोल हा प्लास्टिकचा एक प्रकार आहे.त्याचे लवकर विघटन होत नाही.पर्यावरणासाठी हा अत्यंत घातक घटक आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडतो.जलस्त्रोतांवरही विपरित परिणाम होतो.थर्माकोल जळाल्यानंतर निघणारा वायू हा घातक असतो.या वायूचा ओझोनवरही परिणाम होता.