शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

यंदाचा गणेशोत्सव थर्माकोलमुक्त; व्यापाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:57 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : न्यायालयाने थर्माकोलवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला असून, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील व्यापारी व गणेश मंडळांना बसला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, थर्माकोलपासून तयार केले जाणारे डेकोरेशन यंदाच्या उत्सवात पाहावयास मिळणार नाही. या बंदीमुळे व्यापाºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार असला तरी ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : न्यायालयाने थर्माकोलवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला असून, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील व्यापारी व गणेश मंडळांना बसला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, थर्माकोलपासून तयार केले जाणारे डेकोरेशन यंदाच्या उत्सवात पाहावयास मिळणार नाही. या बंदीमुळे व्यापाºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार असला तरी न्यायालयाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी कौतुक केले आहे.राज्य शासनाने २३ जूनपासून सर्वत्र प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला. या निर्णयाची प्रशासनाकडून सर्वत्र काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोलच्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करून दुकानदार व व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या पथकाने केलेल्या या कारवाईची धास्ती घेऊन दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर टाळला असला तरी थर्माकोलला या बंदीतून सूट द्यावी, अशी मागणी थर्माकोल फॅब्रिकेटर आणि डेकोरेशन समितीने उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवल्याने याचा मोठा फटका व्यापाºयांना बसला आहे.पूर्वी गणपती प्रतिष्ठापनेसाठी घरीच सजावट केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून थर्माकोलपासून बनविण्यात येणारी आसने, लायटिंगचे मंदिर, सिंहासन, पालखी अशा विविध आरास साहित्याची मागणी गणेश मंडळांकडून होऊ लागली आहे. गणेशोत्सवाच्या एक-दोन महिने अगोदर थर्माकोलचा वापर करून मकर व इतर वस्तू तयार केल्या जातात. उत्सवकाळात सजावटीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गणेशोत्सवात थर्माकोलच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा थर्माकोल बंदीमुळे ही उलाढाल थांबणार असून, पूर्वीप्रमाणेचे पारंपरिक रंगबिरंगी पडदे, कागद व लाकडापासून बनविल्या जाणाºया शोभिवंत वस्तूंना मागणी वाढणार आहे.हे आहेत तोटे...थर्माकोल हा प्लास्टिकचा एक प्रकार आहे.त्याचे लवकर विघटन होत नाही.पर्यावरणासाठी हा अत्यंत घातक घटक आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडतो.जलस्त्रोतांवरही विपरित परिणाम होतो.थर्माकोल जळाल्यानंतर निघणारा वायू हा घातक असतो.या वायूचा ओझोनवरही परिणाम होता.