शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव मोहिते राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:46 IST

दीपक शिंदे सातारा लोकसभा मतदार संघात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षाची धुरा प्रतापराव भोसले यांच्याकडे आली. तर कºहाड लोकसभा ...

दीपक शिंदेसातारा लोकसभा मतदार संघात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षाची धुरा प्रतापराव भोसले यांच्याकडे आली. तर कºहाड लोकसभा मतदार संघावरही काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. आनंदराव चव्हाण यांच्यानंतर प्रेमलाताई चव्हाण, तर राजकारणात कुठे थांबावे आणि कसे राहावे याचे उत्तम उदाहरण असलेले यशवंतराव मोहिते यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले.यशवंतराव मोहिते यांनी स्वातंत्र्य चळवळीपासूनच राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रि य सहभाग घेतला होता. शेतकरी कामगार पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली १९४८ मध्ये झाल्या. त्यावेळी यशवंतराव चव्हाणदेखील या पक्षात येतील अशी अपेक्षा होती; पण ते आले नाहीत.१९५२ ची विधानसभेची निवडणूक यशवंतराव मोहिते यांनी शेकापतर्फे लढविली व जिंकली. १९६० मध्ये ते काँग्रेसचे सदस्य झाले व संयुक्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृह उपमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात यशवंतराव मोहिते यांनी कृषी उपमंत्री, गृहनिर्माण आणि परिवहन, अन्न व नागरी पुरवठा, सहकार, अर्थमंत्री अशी विविध पदे भूषविली.१९८० मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन पक्ष त्यावेळी निर्माण झाले होते. यशवंतराव चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाणांचा पराभव कोणीच करू शकणार नाही, असे त्यांनी इंदिरा गांधी यांना स्पष्टपणे सांगितले; पण किमान कºहाड लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी इंदिरा गांधी यांनी कºहाडमधून यशवंतराव मोहिते, सांगलीतून वसंतदादा पाटील आणि साताऱ्यातून शालिनीताई पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी ते कºहाड लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आले.पुढे इंदिरा गांधी आणि यशवंतराव मोहिते यांच्यामध्येही दरी निर्माण झाली आणि इंदिरा गांधी असेपर्यंत आपल्याला भविष्य नाही, असे त्यांचे मत बनले. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतरही ते खासदार होते; पण ते दिल्लीला गेले नाहीत. त्यांनी १९८५ मध्ये लोकसभेची मुदत संपताच गावाकडे निघून गेले.