शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

यशवंतराव यांनीही साजरी केली होती सैनिकांसोबत दिवाळी

By admin | Updated: November 2, 2016 00:07 IST

पंतप्रधान मोदी यांचा सीमेवरील दिवाळीच्या फोटोबरोबर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही सीमेवरील सैनिकांबरोबरील दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले.

कऱ्हाड : काश्मीरच्या सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. दररोज एखादा दुसरा भारतीय जवान शहीद झाल्याची बातमी कानावर येत आहे. अशा परिस्थितीत सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली अन् लाखो भारतीयांना माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आठवण आली. पंतप्रधान मोदी यांचा सीमेवरील दिवाळीच्या फोटोबरोबर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही सीमेवरील सैनिकांबरोबरील दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले. सध्या पाकिस्तान बरोबर चीनने देखील भारताविरोधातील आपल्या कुरापती वाढविल्या आहेत. सीमेवरील खडाजंगीत भारतीय जवान शहीद होताना पाहायला मिळत आहेत. उरी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. मात्र, त्यांचे वीरमरण वाया न जाऊ देता ‘सर्जिकल स्ट्राईक’ च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी त्याला चोख उत्तर दिले. मात्र, तरीही शेजारील काही राष्ट्रांकडून कुरघोड्या थांबलेल्या दिसत नाहीत. अशावेळी सैनिकांचे मनोबल, मनोधैर्य वाढविणे अत्यावश्यक आहे. तीच बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी आपली दिवाळी चीनच्या सीमेवर सैनिकांबरोबर साजरी केली. ही बाब कौतुकाची आहे. अशावेळी ‘हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ या काव्यपक्ती ज्यांच्यासाठी गायल्या जातात. त्या यशवंतराव यांची आठवण प्रकर्षाने होते. १९६२ मध्ये भारताला अपमानास्पद परिस्थितीत सीमेवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळची राजकीय परिस्थितीही अस्थिर होती. निर्णय क्षमतेचा अभाव जाणवत होता. तेव्हा पंतप्रधान असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले कऱ्हाडच्या सुपुत्राला संरक्षणमंत्री म्हणून बोलावले. हाकेला साथ देत चव्हाण हे संरक्षणमंत्री म्हणून कामाला लागले. पराभवाची कारण मिमांसा शोधली. त्रुटींचा आढावा घेतला. अन् सैन्य दलाच्या पुनर्गठणानंतर सक्षम संरक्षणदल उभे करण्याचे काम केले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी देखील असेच सीमेवर जाऊन सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली होती. नरेंद्र मोदी तीच वाट चोखाळत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मनोबल वाढविण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदींबरोबर यशवंतराव यांचे सैन्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून केलेले काम, घेतलेले निर्णय खरच इतरांच्या अभ्यासासाठी योग्य आहेत. त्यांनीही संरक्षणमंत्री असताना सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. - मोहनराव डकरे, सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, कऱ्हाड