शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

यशवंत हायस्कूलचा गुरुकुल प्रकल्प लय भारी ! विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:57 IST

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास मनाशी बाळगून रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाडातील यशवंत हायस्कूलने बारा वर्षांपूर्वी गुरुकुल प्रकल्प सुरू केला.

ठळक मुद्दे२६ विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये मिळाले पैकीच्या पैकी मार्क--माझी शाळा.. ..माझा उपक्रम

संतोष गुरव।कऱ्हाड : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास मनाशी बाळगून रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाड-डातील यशवंत हायस्कूलने बारा वर्षांपूर्वी गुरुकुल प्रकल्प सुरू केला. त्यातून सुमारे सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील पंचवीस विद्यार्थ्यांनी गणित, संस्कृत, समाजशास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले असल्याने हायस्कूलचा गुरुकुल प्रकल्प हा लय भारी ठरला आहे.

१३ जून १९५९ रोजी कऱ्हाड येथे यशवंत हायस्कूलच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यास प्रारंभ केला. शासनाच्या प्रत्येक उपक्रमाची प्रभावीपणे व यशस्वीपणे अंमलबजावणी येथील शिक्षकांनी केली आहे. ४१ शिक्षकांची मान्यता असून, सध्या ३७ शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्याकडून १६०८ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या ठिकाणी ३० तुकड्यामध्ये १२ गुरुकुल, ६ सेमी इंग्रजी आणि १२ मराठी माध्यमांच्या तुकड्यांचा समावेश आहे. हायस्कूलचा यावर्षीचा निकाल हा ९७.५० टक्के लागला असून, ९० टक्केपेक्षा जास्त हे ४७ विद्यार्थी आहेत.

नॅशनल मिरिट स्कॉलरशीप स्पर्धेत हायस्कूलचे ११ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यांना वर्षाकाठी बारा हजार रुपयांची शिष्यवृत्तीही मिळत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता चाचणी असे शिक्षण दिले जाते. त्यामुळे दहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेत निवड झाली आहे.गुरुकुलमधून असे दिले जाते शिक्षण...यशवंत हायस्कूलमध्ये बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गुरूकुल प्रकल्पातून शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशीपच्या परीक्षांबाबत शिक्षक व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ध्येयाला अनुसरून संगणक प्रशिक्षण हे आॅनलाईन पद्धतीच्या माध्यमातून दिले जाते. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सकाळी दोन तोस तसेच शाळा सुटल्यानंतर सायंकाळी दीड तास मार्गदर्शन केले जाते.विद्यार्थी विकासासाठी समित्यांची स्थापना

रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाड येथील यशवंत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शाळा विकास समिती, स्कूल समिती, शालेय व्यवस्थापन समिती अशा अनेक समित्या स्थापन केल्या आहेत.

 

रयत शिक्षण संस्थेच्या यशवत हायस्कूलमध्ये गुरुकुल प्रकल्प हा २००७ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठीही हायस्कूलमधील प्रत्येक शिक्षक परिश्रम घेत आहेत.- ए. एस. साळुंखे, मुख्याध्यापक,  यशवंत हायस्कूल, कºहाड