शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

यशवंत हायस्कूलचा गुरुकुल प्रकल्प लय भारी ! विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:57 IST

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास मनाशी बाळगून रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाडातील यशवंत हायस्कूलने बारा वर्षांपूर्वी गुरुकुल प्रकल्प सुरू केला.

ठळक मुद्दे२६ विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये मिळाले पैकीच्या पैकी मार्क--माझी शाळा.. ..माझा उपक्रम

संतोष गुरव।कऱ्हाड : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास मनाशी बाळगून रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाड-डातील यशवंत हायस्कूलने बारा वर्षांपूर्वी गुरुकुल प्रकल्प सुरू केला. त्यातून सुमारे सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील पंचवीस विद्यार्थ्यांनी गणित, संस्कृत, समाजशास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले असल्याने हायस्कूलचा गुरुकुल प्रकल्प हा लय भारी ठरला आहे.

१३ जून १९५९ रोजी कऱ्हाड येथे यशवंत हायस्कूलच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यास प्रारंभ केला. शासनाच्या प्रत्येक उपक्रमाची प्रभावीपणे व यशस्वीपणे अंमलबजावणी येथील शिक्षकांनी केली आहे. ४१ शिक्षकांची मान्यता असून, सध्या ३७ शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्याकडून १६०८ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या ठिकाणी ३० तुकड्यामध्ये १२ गुरुकुल, ६ सेमी इंग्रजी आणि १२ मराठी माध्यमांच्या तुकड्यांचा समावेश आहे. हायस्कूलचा यावर्षीचा निकाल हा ९७.५० टक्के लागला असून, ९० टक्केपेक्षा जास्त हे ४७ विद्यार्थी आहेत.

नॅशनल मिरिट स्कॉलरशीप स्पर्धेत हायस्कूलचे ११ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यांना वर्षाकाठी बारा हजार रुपयांची शिष्यवृत्तीही मिळत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता चाचणी असे शिक्षण दिले जाते. त्यामुळे दहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेत निवड झाली आहे.गुरुकुलमधून असे दिले जाते शिक्षण...यशवंत हायस्कूलमध्ये बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गुरूकुल प्रकल्पातून शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशीपच्या परीक्षांबाबत शिक्षक व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ध्येयाला अनुसरून संगणक प्रशिक्षण हे आॅनलाईन पद्धतीच्या माध्यमातून दिले जाते. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सकाळी दोन तोस तसेच शाळा सुटल्यानंतर सायंकाळी दीड तास मार्गदर्शन केले जाते.विद्यार्थी विकासासाठी समित्यांची स्थापना

रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाड येथील यशवंत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शाळा विकास समिती, स्कूल समिती, शालेय व्यवस्थापन समिती अशा अनेक समित्या स्थापन केल्या आहेत.

 

रयत शिक्षण संस्थेच्या यशवत हायस्कूलमध्ये गुरुकुल प्रकल्प हा २००७ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठीही हायस्कूलमधील प्रत्येक शिक्षक परिश्रम घेत आहेत.- ए. एस. साळुंखे, मुख्याध्यापक,  यशवंत हायस्कूल, कºहाड