शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मोबाईलच्या जगतात चिऊताई झाली भुर्रर्रऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

कुडाळ : पहाटेच्या प्रहरी गाय-गुरांच्या हंबरण्याबरोबरच पक्ष्यांचा कलकलाट सुरू होतो. अशातच कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताईची चिवचिवही कानी यायची. ...

कुडाळ : पहाटेच्या प्रहरी गाय-गुरांच्या हंबरण्याबरोबरच पक्ष्यांचा कलकलाट सुरू होतो. अशातच कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताईची चिवचिवही कानी यायची. नियमितपणे आपल्या अंगणात ती पहुडताना दिसायची; मात्र आजच्या मोबाईलच्या युगात ही चिऊताईच कुठे दिसेनाशी झाली झाली आहे. भुर्र... भुर्र... उडून जात नेमकी कुठे गायब झाली आहे, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

आधुनिकतेचे पांघरूण घालून आपण आज प्रगतीची शिखरे सर करत आहोत. हे करत असताना आपल्या बालपणी चिऊ आणि काऊची गोष्ट साऱ्यांनाच आवडायची; मात्र या गोष्टीतील चिऊताई आधुनिकतेच्या विकासाला बळी पडल्याचे दिसत आहे. मोबाईलची क्रांती ही साऱ्यांच्याच फायद्याची ठरली. मात्र, या लहानशा चिऊताईच्या जीवावरच उठली. यामुळे नियमितपणे अंगणात वावरणारी चिमणी आता क्वचितच पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मोबाईल टॉवर व त्यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चिमण्यांच्या संहाराला कारणीभूत ठरले. या लहरींची तीव्रता जसजशी वाढत जाईल, तसा याचा गंभीर परिणाम इवल्याशा चिमणीला भोगावा लागत आहे.

आज जगभरात जवळपास चिमण्यांच्या २६ जाती पाहायला मिळतात. यापैकी भारतात सहा जातींची नोंद आहे. आजच्या परिस्थितीत यांची संख्या मात्र कमी होत आहे. लहान बालकांना जेवण भरवताना एक घास चिऊचा, एक ताईचा म्हणत ही पिढी मोठी झाली आहे. मात्र, येणाऱ्या पिढीला हा इवलासा पक्षी पाहायला मिळेल की चित्रातच पाहावे लागेल, हा प्रश्नच आहे.

मोबाईल टॉवरद्वारे निघणारे रेडिएशन या पक्ष्यांच्या जननक्षमतेवर परिणाम करत आहे, हे आत संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला चिऊ-काऊंच्या गोष्टीमधील चिऊचे पुन्हा दर्शन होण्यासाठी आपणच प्रयत्नशील असायला हवे. अन्यथा पुढील काही वर्षांत चिमणी हा पक्षीच नामशेष होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

(चौकट)

चिमण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम...

चिमणी हा पक्षी नावाप्रमाणेच दिसायलाही लहान असला तरी निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. शेतातील किडीचे संतुलन ठेवत चिमण्या एकप्रकारे शेतकऱ्याला मदतच करतात. मात्र, वाढते औद्योगिकीकरण आणि प्रदूषण याचा फटका या लहानशा जीवाला बसला आहे.

मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे चिमण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यांची संख्या कमी होत असून, यामुळे ही प्रजाती नामशेष न होता त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.