शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

मोबाईलच्या जगतात चिऊताई झाली भुर्रर्रऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

कुडाळ : पहाटेच्या प्रहरी गाय-गुरांच्या हंबरण्याबरोबरच पक्ष्यांचा कलकलाट सुरू होतो. अशातच कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताईची चिवचिवही कानी यायची. ...

कुडाळ : पहाटेच्या प्रहरी गाय-गुरांच्या हंबरण्याबरोबरच पक्ष्यांचा कलकलाट सुरू होतो. अशातच कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताईची चिवचिवही कानी यायची. नियमितपणे आपल्या अंगणात ती पहुडताना दिसायची; मात्र आजच्या मोबाईलच्या युगात ही चिऊताईच कुठे दिसेनाशी झाली झाली आहे. भुर्र... भुर्र... उडून जात नेमकी कुठे गायब झाली आहे, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

आधुनिकतेचे पांघरूण घालून आपण आज प्रगतीची शिखरे सर करत आहोत. हे करत असताना आपल्या बालपणी चिऊ आणि काऊची गोष्ट साऱ्यांनाच आवडायची; मात्र या गोष्टीतील चिऊताई आधुनिकतेच्या विकासाला बळी पडल्याचे दिसत आहे. मोबाईलची क्रांती ही साऱ्यांच्याच फायद्याची ठरली. मात्र, या लहानशा चिऊताईच्या जीवावरच उठली. यामुळे नियमितपणे अंगणात वावरणारी चिमणी आता क्वचितच पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मोबाईल टॉवर व त्यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चिमण्यांच्या संहाराला कारणीभूत ठरले. या लहरींची तीव्रता जसजशी वाढत जाईल, तसा याचा गंभीर परिणाम इवल्याशा चिमणीला भोगावा लागत आहे.

आज जगभरात जवळपास चिमण्यांच्या २६ जाती पाहायला मिळतात. यापैकी भारतात सहा जातींची नोंद आहे. आजच्या परिस्थितीत यांची संख्या मात्र कमी होत आहे. लहान बालकांना जेवण भरवताना एक घास चिऊचा, एक ताईचा म्हणत ही पिढी मोठी झाली आहे. मात्र, येणाऱ्या पिढीला हा इवलासा पक्षी पाहायला मिळेल की चित्रातच पाहावे लागेल, हा प्रश्नच आहे.

मोबाईल टॉवरद्वारे निघणारे रेडिएशन या पक्ष्यांच्या जननक्षमतेवर परिणाम करत आहे, हे आत संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला चिऊ-काऊंच्या गोष्टीमधील चिऊचे पुन्हा दर्शन होण्यासाठी आपणच प्रयत्नशील असायला हवे. अन्यथा पुढील काही वर्षांत चिमणी हा पक्षीच नामशेष होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

(चौकट)

चिमण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम...

चिमणी हा पक्षी नावाप्रमाणेच दिसायलाही लहान असला तरी निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. शेतातील किडीचे संतुलन ठेवत चिमण्या एकप्रकारे शेतकऱ्याला मदतच करतात. मात्र, वाढते औद्योगिकीकरण आणि प्रदूषण याचा फटका या लहानशा जीवाला बसला आहे.

मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे चिमण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यांची संख्या कमी होत असून, यामुळे ही प्रजाती नामशेष न होता त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.