शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मोरणा-गुरेघर कालव्यांची कामे अर्धवट स्थितीत

By admin | Updated: December 25, 2016 23:42 IST

कोट्यवधी रुपये पाण्यात : शेतकऱ्यांना लाभच नाही; ठेकेदारांचा गैरकारभार अन् निधीच्या चणचणीत शासनाची चालढकल

पाटण : तालुक्याच्या मरळी-मोरणा परिसर अन् कऱ्हाडचा काही शेती परिसर सुजलाम् सुफलाम् करणारा मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प आणि त्याद्वारे काढण्यात आलेले डावे आणि उजवे कालवे ही कामे बऱ्याच वर्षांपासून अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. ठेकेदारांचा गैरकारभार, निधींची चणचण आणि सध्याच्या शासनाची चाल ढकल यामुळे मोरणा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांची कामे ठप्प आहेत. १९९६ मध्ये मोरणा नदीवरील मोरणा-गुरेघर प्रकल्पास कामाला सुरुवात झाली. त्यानंतर १५ वर्षे उलटली आणि मोरणा प्रकल्पातील पाणी साठवण करण्याची कामे पूर्ण झाली. जवळपास १ टीएमसी पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी होईल, अशी आशा निर्माण झाली होती. त्यासाठी दोन्ही बाजूंनी कालवे काढण्याचे काम सुरू झाले. कालव्यांची कामे वर्षभर चालली. ठेकेदारांना कोट्यवधी रुपये निधी दिला. मात्र, कालव्यांच्या कामांना पुढे दृष्ट लागली आणि चार ठेकेदारांची कामेच बंद पडली. या कामात कुणी गैरव्यवहार केला तर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना मोबदला दिला नाही, असे आरोप झाले. शासनाने पुढे कालव्यांच्या कामांना निधीच न दिल्यामुळे ठेकेदारांनी आपले चंबुगबाळे उचलून पलायन केले. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या शेतात कालव्यांच्या अर्धवट कामांमुळे अडचण होऊन बसली आहे. मोठमोठे खड्डे काढून ठेवल्यामुळे कालव्यांच्या आजूबाजूची शेती नापिक झाली आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. मोरणा-गुरेघर प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून, त्या प्रकल्पाच्या अवतीभोवतीचा परिसर निसर्गरम्य आहे. या प्रकल्पाचे अधिकारी कोणी पुण्यात तर कोण साताऱ्यात राहतात. त्यामुळे मोरणा प्रकल्पाला लॅण्डमाफियांचा विळखा पडला असून, पाणी साठ्यालगत जमिनी काबीज केल्या आहेत. कोणी फार्महाउस तर कोणी बोटिंग करण्यास सुरुवात केली आहे. हे रोखण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी का पुढे येत नाहीत? भविष्यात या अतिक्रमणांची वनविभाग व कृष्णा खोरे आणि व्याघ्र प्रकल्प विभागाने दखल घेतली नाही तर मोरणा प्रकल्प हायजॅक होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. पाटण तालुक्यातील गोकूळ तर्फ पाटण, धावडे, कोरडेवाडी, आंब्रग, शिद्रूकवाडी, पेठशिवापूर, मोरगिरी, कुसरूंड, नाटोशी, आडदेव, कोंदळ, बेलवडे, आंब्रुळे, सोनवडे, सुळेवाडी, गव्हाणवाडी, पापर्डे, साजूर, गारुडे आदी गावांना मोरणा-गुरेघर प्रकल्पांचा लाभ होणार आहे.‘मोरणा-गुरेघर प्रकल्पातून शंभर मीटरपर्यंत पाणी उचलून द्यावे आणि प्राधान्याने या प्रकल्पासाठी त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी द्यावे, अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी केली आहे. रखडलेली प्रकल्पांची कामे सुरू करण्यास आपण प्रयत्नशील,’ असे आमदार देसाई म्हणाले. (प्रतिनिधी)