शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

मोरणा-गुरेघर कालव्यांची कामे अर्धवट स्थितीत

By admin | Updated: December 25, 2016 23:42 IST

कोट्यवधी रुपये पाण्यात : शेतकऱ्यांना लाभच नाही; ठेकेदारांचा गैरकारभार अन् निधीच्या चणचणीत शासनाची चालढकल

पाटण : तालुक्याच्या मरळी-मोरणा परिसर अन् कऱ्हाडचा काही शेती परिसर सुजलाम् सुफलाम् करणारा मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प आणि त्याद्वारे काढण्यात आलेले डावे आणि उजवे कालवे ही कामे बऱ्याच वर्षांपासून अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. ठेकेदारांचा गैरकारभार, निधींची चणचण आणि सध्याच्या शासनाची चाल ढकल यामुळे मोरणा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांची कामे ठप्प आहेत. १९९६ मध्ये मोरणा नदीवरील मोरणा-गुरेघर प्रकल्पास कामाला सुरुवात झाली. त्यानंतर १५ वर्षे उलटली आणि मोरणा प्रकल्पातील पाणी साठवण करण्याची कामे पूर्ण झाली. जवळपास १ टीएमसी पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी होईल, अशी आशा निर्माण झाली होती. त्यासाठी दोन्ही बाजूंनी कालवे काढण्याचे काम सुरू झाले. कालव्यांची कामे वर्षभर चालली. ठेकेदारांना कोट्यवधी रुपये निधी दिला. मात्र, कालव्यांच्या कामांना पुढे दृष्ट लागली आणि चार ठेकेदारांची कामेच बंद पडली. या कामात कुणी गैरव्यवहार केला तर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना मोबदला दिला नाही, असे आरोप झाले. शासनाने पुढे कालव्यांच्या कामांना निधीच न दिल्यामुळे ठेकेदारांनी आपले चंबुगबाळे उचलून पलायन केले. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या शेतात कालव्यांच्या अर्धवट कामांमुळे अडचण होऊन बसली आहे. मोठमोठे खड्डे काढून ठेवल्यामुळे कालव्यांच्या आजूबाजूची शेती नापिक झाली आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. मोरणा-गुरेघर प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून, त्या प्रकल्पाच्या अवतीभोवतीचा परिसर निसर्गरम्य आहे. या प्रकल्पाचे अधिकारी कोणी पुण्यात तर कोण साताऱ्यात राहतात. त्यामुळे मोरणा प्रकल्पाला लॅण्डमाफियांचा विळखा पडला असून, पाणी साठ्यालगत जमिनी काबीज केल्या आहेत. कोणी फार्महाउस तर कोणी बोटिंग करण्यास सुरुवात केली आहे. हे रोखण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी का पुढे येत नाहीत? भविष्यात या अतिक्रमणांची वनविभाग व कृष्णा खोरे आणि व्याघ्र प्रकल्प विभागाने दखल घेतली नाही तर मोरणा प्रकल्प हायजॅक होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. पाटण तालुक्यातील गोकूळ तर्फ पाटण, धावडे, कोरडेवाडी, आंब्रग, शिद्रूकवाडी, पेठशिवापूर, मोरगिरी, कुसरूंड, नाटोशी, आडदेव, कोंदळ, बेलवडे, आंब्रुळे, सोनवडे, सुळेवाडी, गव्हाणवाडी, पापर्डे, साजूर, गारुडे आदी गावांना मोरणा-गुरेघर प्रकल्पांचा लाभ होणार आहे.‘मोरणा-गुरेघर प्रकल्पातून शंभर मीटरपर्यंत पाणी उचलून द्यावे आणि प्राधान्याने या प्रकल्पासाठी त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी द्यावे, अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी केली आहे. रखडलेली प्रकल्पांची कामे सुरू करण्यास आपण प्रयत्नशील,’ असे आमदार देसाई म्हणाले. (प्रतिनिधी)