शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त पडू लागले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त पडू लागले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. केवळ शिक्षण आणि अध्यापनावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले, तर इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल, असा शिक्षकांचा सूर आहे.

जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांनी स्वीकारली आहेत. मात्र, त्याशिवाय मतदार पुनर्निरीक्षण, बीएलओ या कामांचाही ताण शिक्षकांवर दिला जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या कामांसाठी शिक्षकांना वेतन दिले जाते, त्याचे काम न करता अन्य कामांचेच ओझे त्यांच्यावर लादले जाते. असं करण्यापेक्षा शिक्षकांना ज्या कामांसाठी मानधन दिले जाते, ते मानधन बेरोजगारांना देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेतली, तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. यापेक्षाही अन्य काही पर्यायी व्यवस्था शासनाला करणं शक्य असेल, तर त्यांनी ती करून शिक्षकांची या अतिरिक्त ताणातून मुक्तता द्यावी, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

एक शिक्षकी शाळांचे हाल

जिल्ह्यात एक शिक्षकी शाळांचा आकडाही मोठा आहे. त्यात शिक्षकेतर पदे भरण्यावरील बंदी आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांवर सर्वच वर्गांची जबाबदारी असते. एक शिक्षक शिक्षकेतर कामात अडकून पडला, तर त्याचा विद्यार्थी शिक्षणावर परिणाम होतो.

पॉइंटर

१२४७

जिल्हा परिषदेच्या शाळा

११३९८

जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या

४,११,१०७

जिल्हा परिषद शाळा विद्यार्थीसंख्या

कोट :

शिक्षकांना अध्यापनाशिवाय ३६ प्रकारची कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको, असं वाटते.

- राजेंद्र बोराटे, शिक्षक

शिक्षक शासकीय कर्मचारी आहे. त्यांना शिक्षणाशिवाय काही कामं दिली तर ते करतात. मूळ ज्या कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्या अध्यापनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

चौकट

शासकीय योजनांचा भार

शिक्षकांना मतदारयादी, पशू, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वेक्षण, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच शाळेला एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.

पोषण आहार, धान्यवाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकॉर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या-औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमात शिक्षक केंद्रस्थानी असतो.

कोरोनाकाळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.