शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त पडू लागले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त पडू लागले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. केवळ शिक्षण आणि अध्यापनावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले, तर इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल, असा शिक्षकांचा सूर आहे.

जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांनी स्वीकारली आहेत. मात्र, त्याशिवाय मतदार पुनर्निरीक्षण, बीएलओ या कामांचाही ताण शिक्षकांवर दिला जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या कामांसाठी शिक्षकांना वेतन दिले जाते, त्याचे काम न करता अन्य कामांचेच ओझे त्यांच्यावर लादले जाते. असं करण्यापेक्षा शिक्षकांना ज्या कामांसाठी मानधन दिले जाते, ते मानधन बेरोजगारांना देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेतली, तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. यापेक्षाही अन्य काही पर्यायी व्यवस्था शासनाला करणं शक्य असेल, तर त्यांनी ती करून शिक्षकांची या अतिरिक्त ताणातून मुक्तता द्यावी, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

एक शिक्षकी शाळांचे हाल

जिल्ह्यात एक शिक्षकी शाळांचा आकडाही मोठा आहे. त्यात शिक्षकेतर पदे भरण्यावरील बंदी आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांवर सर्वच वर्गांची जबाबदारी असते. एक शिक्षक शिक्षकेतर कामात अडकून पडला, तर त्याचा विद्यार्थी शिक्षणावर परिणाम होतो.

पॉइंटर

१२४७

जिल्हा परिषदेच्या शाळा

११३९८

जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या

४,११,१०७

जिल्हा परिषद शाळा विद्यार्थीसंख्या

कोट :

शिक्षकांना अध्यापनाशिवाय ३६ प्रकारची कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको, असं वाटते.

- राजेंद्र बोराटे, शिक्षक

शिक्षक शासकीय कर्मचारी आहे. त्यांना शिक्षणाशिवाय काही कामं दिली तर ते करतात. मूळ ज्या कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्या अध्यापनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

चौकट

शासकीय योजनांचा भार

शिक्षकांना मतदारयादी, पशू, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वेक्षण, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच शाळेला एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.

पोषण आहार, धान्यवाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकॉर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या-औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमात शिक्षक केंद्रस्थानी असतो.

कोरोनाकाळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.