शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवनमधून ५४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

जिल्हा परिषद... लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य ...

जिल्हा परिषद...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनांसाठी २६ कोटी ५० लाखांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. तर पाणी योजनांत कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक गावे आहेत.

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत लोकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाणी योजना राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यातील ५४ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे निविदा निघाल्यानंतर कामे सुरू होतील.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ५४ गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे ही कऱ्हाड तालुक्यातील असून यानंतर फलटण, खंडाळा, सातारा, पाटण जावळी, महाबळेश्वर आणि कोरेगाव या तालुक्यांचा क्रमांक लागतो. ५४ पाणीपुरवठा योजनांसाठी २६ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

पाणीपुरवठा योजनांतर्गत कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी, भुरभुशी, घोगाव, किवळ, साळशिरंबे, सुर्ली, वडोली, निळेश्वर आदी गावांच्या योजनांची कामे होतील. तर खंडाळा तालुक्यात शिवाजीनगर, पिसाळवाडी, वाठार बुद्रुक, आसवली तर फलटण तालुक्यात आदर्की बुद्रुक, बिबी, गोखळी, दुधेबावी आदी गावांतील पाणी योजनांची कामे होणार आहेत. सातारा तालुक्यातील जांबगाव, रामकृष्णनगर, शिवथर आदी तर पाटणमधील कराटे, मरळी आदी गावांतील पाणी योजना कामे करण्यात येणार आहेत.

कोट :

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५४ गावांच्या पाणीपुरवठा योजना कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या पाणीपुरवठा योजना कामांचे टेंडर काढण्यात येईल. त्यानंतर योजनांची कामे सुरू होणार आहेत.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी

..................................................................