शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

रहाटाघर येथील वीज उपकेंद्राचे काम रखडले

By admin | Updated: October 1, 2014 21:27 IST

महावितरण कंपनी : पावसामुळे उपकेंद्र परिसरात पाणी

कार्वे : निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो़ यावर्षीही अवेळी व मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ काकडीसह सोयाबीनचेही दर गडगडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे़यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली़ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून बराच काळ लांबला़ परिणामी, शेतकऱ्यांची पेरणी, टोकणीचीही कामे खोळंबली़ शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली असली तरी पाऊसच नसल्याने टोकणी व पेरणीला खो बसला़ शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते़ बऱ्याच प्रतीक्षेनंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली़ त्यामुळे शेतकरी सुखावले़ त्यांची पेरणी, टोकणीची लगबग सुरू झाली़ मुसळधार पाऊस झाला नसला तरी संततधार सुरू राहिल्याने पिकांच्या पेरणी, टोकणीसाठी पोषक वातावरण तयार झाले होते़ अशातच पावसाचा मुक्काम लांबला़ त्यामुळे शेतात पाणी साचले़ सोयाबीनसह अनेक पिके पाण्याखाली बुडाली़ काकडीची फुलकळी झडली़ तसेच मुळ्याही कुजल्या़ त्याचा फटका उत्पन्नावर झाला़ शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही़ मोठ्या क्षेत्रातूनही अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले़ सुरुवातीला काकडीचा दर चांगला होता़ मात्र, काही दिवसांतच दर कमी झाला़ सोयाबीनचीही हीच अवस्था झाली़ अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून सोयाबीनची लागवड केली़ त्याला खत, पाण्याचे नियोजन केले़ मात्र, एवढे करूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकातून कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले़ (वार्ताहर)उत्पादनापेक्षा बियाणाचा खर्च तिप्पटजून, जुलै महिन्यांत सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना त्याचा दर पाहून शेतकऱ्यांना अक्षरश: घाम फुटला होता़ सोयाबीनच्या बियाणाचा दर प्रतिकिलो १०० रुपये एवढा होता़ म्हणजे बियाणाचा दर प्रतिक्विंटल दहा हजार रुपये होता़ मात्र, एवढे महाग बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला फक्त तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय़ व्यापारी शेतकऱ्यांकडून फक्त तीस रुपये किलोने सोयाबीन खरेदी करतायत़