शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

महाबळेश्वरातील स्मशानभूमी प्रकल्पाचे काम रखडले

By admin | Updated: November 21, 2014 00:26 IST

पालिकेचे दुर्लक्ष : बिल अदा न झाल्याने ठेकेदार गायब

महाबळेश्वर : पालिकेत सध्या सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांचा मनमानी कारभार सुरू आहे. नागरिकांच्या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या स्मशानभूमी प्रकल्पाचे काम गेली अनेक महिने बंद आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्ता डांबरीकरण व वाहतुकीच्या कोंडीसाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना याबाबत गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.वेण्णा धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यात महाबळेश्वरची हिंदू स्मशानभूमी गेल्याने पालिकेने या स्मशानभूमीपासून थोड्या अंतरावर एक तात्पुरते शेड बांधून दहनविधीची सोय केली आहे. या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता एका खासगी संस्थेच्या जागेतून जात असल्याने त्या रस्त्याचे डांबरीकरण अथवा देखभाल पालिकेला करता येत नाही. पावसाळ्यात स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे म्हणजे एक दिव्यच आहे. म्हणून पालिकेने महूसल विभागाच्या शेजारी वनविभागाच्या जागेत स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला. वन विभागाकडून यासाठी जागा मिळविण्यासाठी पालिकेला खूप वर्षे लागली. मागील वर्षी ती जागा पालिकेच्या ताब्यात मिळाली. याठिकाणी आदर्श स्मशानभूमी बांधण्याचा आराखडा पालिकेने तयार केला. त्यानुसार मागील वर्षी दफन व दहनविधीसाठी लागणारी सोयीसुविधा नागरिकांना मिळतील, असा आराखडा तयार करून त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने काम बंद करण्यात आले. परंतु पावसाळा संपून आता दोन महिने झाले तरी हे काम पुन्हा सुरू झाले नाही. ठेकेदाराने बांधकाम साहित्यासह गाशा गुंडाळला आहे. पालिकेने बिल अदा केले नसल्याने ठेकेदाराने काम बंद केल्याचे समजते. पालिकेत सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)