शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

‘किसन वीर’कडून माणसं उभी करण्याचं काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : ‘माणसात परमेश्वर पाहणे आवश्यक असून किसन वीर कारखान्याचा परिसर पाहिल्यानंतर हेच काम येथे सुरू असल्याचे दिसून येते. एक सहकारी साखर कारखाना आपल्या कामातून माणसं उभं करण्याचे काम करत आहे, हे चित्रच वेगळे असून आजच्या काळात ते आशादायी आहे,’ असे प्रतिपादन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : ‘माणसात परमेश्वर पाहणे आवश्यक असून किसन वीर कारखान्याचा परिसर पाहिल्यानंतर हेच काम येथे सुरू असल्याचे दिसून येते. एक सहकारी साखर कारखाना आपल्या कामातून माणसं उभं करण्याचे काम करत आहे, हे चित्रच वेगळे असून आजच्या काळात ते आशादायी आहे,’ असे प्रतिपादन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.भुर्इंज (ता. वाई, जि. सातारा) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कारखान्याचे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किसन वीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी मंत्री आणि संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ तर हिवरे बाजारचे (जि. अहमदनगर) आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, अनुक्रमे एक लाख एकावन्न हजार रुपये रोख, शॉल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. निलिमा भोसले, खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, ज्ञानदीप सोसायटीचे चेअरमन जिजाबा पवार, संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पाटील पुढे म्हणाले, ‘जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय बाळगले पाहिजे. ध्येयाशिवाय यशस्वी होणे कठीण आहे. त्यासाठी ध्येय आणि प्रयत्नांमध्ये सातत्य असले पाहिजे. अशा ध्येयांना, प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ आणि ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कारा’तून होत आहे. या ठिकाणी ज्यांना पुरस्कार दिला, ते दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले असून, या पुरस्कारांच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचा गौरव झाला आहे.’यावेळी ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांनी किसन वीर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन व सन्मानपत्रांचे वाचन केले.कोल्हे, पवार यांचं कार्य दिशादर्शककारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले म्हणाले, ‘जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक असणारे आबासाहेब वीर यांच्या नावाने हा पुरस्कार असल्याने या पुरस्काराचे मोल मोठे आहे. या नावाच्या पुरस्काराला साजेसेच पुरस्कारमूर्ती शंकरराव कोल्हे आणि पोपटराव पवार यांच्या रुपाने लाभले आहेत. त्यांचे कार्य सर्वांनाच दिशा व प्रेरणा देणारं आहे. त्यांनी केलेलं कार्य त्यांच्या गावापुरतं मर्यादित राहिलं नसून या कामातून अनेक गावांचा कायापालट झाला पाहिजे.’पुरस्काराचा आनंद सर्वात मोठा : पवारहिवरे बाजारचे (जि. अहमदनगर) आदर्श सरपंच पोपटराव पवार म्हणाले, ‘मदन भोसले यांनी आपल्या रचनात्मक, विधायक व दुरदृष्टीतून किसन वीर साखर कारखान्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. आजचा दिवस खूप वेगळा आहे. मिळालेला पुरस्कार आजपर्यंतच्या मिळालेल्या सर्व पुरस्कारांमध्ये सर्वात उंचीचा पुरस्कार आहे.’