शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काम झालं २०१४ मध्ये; निविदा काढली २०१७ ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:32 IST

रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्षाचे नगरसेवक ...

ठळक मुद्देरहिमतपूर पालिकेवर आरोप : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, सरंक्षक भिंत बांधकामाच्या चौकशीची नगरसेवकाकडून मागणी

रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्षाचे नगरसेवक नीलेश माने यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहिमतपूरमधील कुंभारगल्ली येथील रस्ता सुधारणा करण्याकामी कापूर ओढा येथे आरसीसी सरंक्षक भिंत बांधकाम अंदाजपत्रकीय रक्कम २८.७५ लाख रुपये आहे. या कामाची दि. ९ मे २०१७ रोजी एका जाहिरातीद्वारे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दि. १९ जून २०१७ रोजी विशेष सभा बोलावून सभागृहामध्ये ती मंजुरीसाठी ठेवण्यात आली. हे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच झालेल्या कामाची निविदा कशी केली? अशी विचारणा केली. यावर नगराध्यक्षांनी या बाबीची चौकशी करून सभागृहास निवेदन करण्याचे आश्वासन दिले.पुन्हा दि. २७ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे या विषयाला हरकत घेतली. मागील सभेचा ठराव क्र. ५६ अ. नं.२१ मध्ये वरील काम सर्वानुमते मंजूर असा चुकीचा ठराव लिहिण्यात आला होता, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.नगराध्यक्षांनी या कामाबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना मुख्याधिकाºयांना केली. मुख्याधिकाºयांनी ३ आॅक्टोबर २०१७ रोजी या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याबाबतची सूचना कंत्राटी कामगार अबुभाई मुल्ला यांना केली होती. विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने संबंधित कंत्राटी कामगारास स्मरणपत्र काढण्यात आले. तरीही अहवाल प्राप्त न झाल्याने मुख्याधिकाºयांनी १ मार्च २०१८ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला.या अहवालामध्ये २०१४-१५ या आर्थिक वर्षात संबंधित काम पूर्ण झाले असल्याचे म्हटले आहे. त्याच कामाची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी यांच्याकडून २४ मार्च २०१७ रोजी आदेशाने मिळाल्याचे नमूद केले आहे. संबंधित काम पूर्ण झाल्याचा २०१४-१५ कामाचा ठराव, दि. २१ जुलै २०१६ कामाची प्रशासकीय मंजुरी २४ मार्च २०१७ व कामाची निविदा ९ मे २०१७ अशा उलट्या क्रमाने विकासकामाचे कामकाज करण्यात आले आहे. ही बाब गंभीर असून, जिल्हाधिकारी कार्यालयाला अंधारात ठेवून जनतेच्या पैशाचा अपहार करण्याचा उद्देश दिसून येत आहे. तरी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती, कंत्राटदार कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी काँग्रेसचे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश भोसले, रहिमतपूर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष धनंजय पवार, नानासो माने, नगरसेवक अनिल गायकवाड व माजी नगरसेवक शंकर भोसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.