शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काम झालं २०१४ मध्ये; निविदा काढली २०१७ ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:32 IST

रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्षाचे नगरसेवक ...

ठळक मुद्देरहिमतपूर पालिकेवर आरोप : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, सरंक्षक भिंत बांधकामाच्या चौकशीची नगरसेवकाकडून मागणी

रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्षाचे नगरसेवक नीलेश माने यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहिमतपूरमधील कुंभारगल्ली येथील रस्ता सुधारणा करण्याकामी कापूर ओढा येथे आरसीसी सरंक्षक भिंत बांधकाम अंदाजपत्रकीय रक्कम २८.७५ लाख रुपये आहे. या कामाची दि. ९ मे २०१७ रोजी एका जाहिरातीद्वारे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दि. १९ जून २०१७ रोजी विशेष सभा बोलावून सभागृहामध्ये ती मंजुरीसाठी ठेवण्यात आली. हे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच झालेल्या कामाची निविदा कशी केली? अशी विचारणा केली. यावर नगराध्यक्षांनी या बाबीची चौकशी करून सभागृहास निवेदन करण्याचे आश्वासन दिले.पुन्हा दि. २७ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे या विषयाला हरकत घेतली. मागील सभेचा ठराव क्र. ५६ अ. नं.२१ मध्ये वरील काम सर्वानुमते मंजूर असा चुकीचा ठराव लिहिण्यात आला होता, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.नगराध्यक्षांनी या कामाबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना मुख्याधिकाºयांना केली. मुख्याधिकाºयांनी ३ आॅक्टोबर २०१७ रोजी या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याबाबतची सूचना कंत्राटी कामगार अबुभाई मुल्ला यांना केली होती. विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने संबंधित कंत्राटी कामगारास स्मरणपत्र काढण्यात आले. तरीही अहवाल प्राप्त न झाल्याने मुख्याधिकाºयांनी १ मार्च २०१८ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला.या अहवालामध्ये २०१४-१५ या आर्थिक वर्षात संबंधित काम पूर्ण झाले असल्याचे म्हटले आहे. त्याच कामाची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी यांच्याकडून २४ मार्च २०१७ रोजी आदेशाने मिळाल्याचे नमूद केले आहे. संबंधित काम पूर्ण झाल्याचा २०१४-१५ कामाचा ठराव, दि. २१ जुलै २०१६ कामाची प्रशासकीय मंजुरी २४ मार्च २०१७ व कामाची निविदा ९ मे २०१७ अशा उलट्या क्रमाने विकासकामाचे कामकाज करण्यात आले आहे. ही बाब गंभीर असून, जिल्हाधिकारी कार्यालयाला अंधारात ठेवून जनतेच्या पैशाचा अपहार करण्याचा उद्देश दिसून येत आहे. तरी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती, कंत्राटदार कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी काँग्रेसचे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश भोसले, रहिमतपूर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष धनंजय पवार, नानासो माने, नगरसेवक अनिल गायकवाड व माजी नगरसेवक शंकर भोसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.